मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : श्रेयस अय्यरने सामना १११ चेंडूत नाबाद ११३ धावांवर संपवला कारण त्याच्या शतकाच्या जोरावर रांचीमधील दुसऱ्या वनडेत भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट्सने विजय मिळवला. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी साधली आहे,
निर्णायक तिसरा एकदिवसीय सामना मंगळवारी दिल्लीत होणार आहे. अय्यरने इशान किशनसोबत तिसर्या विकेटसाठी १६१ धावांची भागीदारी केवळ १५५ चेंडूंत केली. किशनला मात्र त्याच्या घरच्या मैदानावर पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आले नाही कारण तो ८४ चेंडूत ९३ धावांवर बाद झाला. तत्पूर्वी एडन मार्कराम (७९) आणि रीझा हेंड्रिक्स (७४) यांच्यामुळे दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ बाद २७८ धावा केल्या होत्या.
मोहम्मद सिराजने १० षटकांत ३८ धावांत ३ गडी बाद केले, तर वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने भारताविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






