मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील पुढील मंत्रिमंडळ विस्तारासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) साठी मंत्रीपद मागितले आहे. आठवले यांनी आरपीआय (ए) कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ही माहिती दिली.
आठवले म्हणाले की, त्यांनी योग्य मंचावर मंत्रीपदाची मागणी आधीच मांडली आहे. पुढील वर्षी महाराष्ट्रात किमान दोन ते तीन लोकसभेच्या जागा आणि १० ते १५ विधानसभा मतदारसंघात आरपीआय (ए) ला तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा आहेत. आठवले म्हणाले की, आरपीआय (ए) महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी सर्व निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि शिवसेनेसोबत युती करून लढेल.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






