जामनेर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू……

Spread the love

जामनेर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्राचे भविष्य मराठा नेतृत्व मा. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भात जो लढा उभा केला आहे. तो समाज हिताचा आहे. त्यांचा हा संघर्ष प्रेरणादायी आहे. त्यांच्या मागण्या ह्या रास्त आहेतं. झोपलेल्या सरकार व शासनाच्या विरोधातील या लढ्याला पाठींबा देण्यासाठी आज जामनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे.
त्यासोबत मला समाजाला लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे. समाजाच्या भावनेसोबत न खेळता समाजातील परिस्थिती ही टोकाला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संजय गरुड,दिगंबर पाटील, विलास राजपूत यांनी या साखळी उपोषणास जाहीर पाठींबा दिला.
यावेळी साखळी आंदोलनास उपस्थित दिलीप खोडपे,राहुल चव्हाण,अतुल सोनवणे,अशोक पाटील,प्रदिप गायके,अमोल ठोबरे,विश्वजित पाटील, प्रकाश पाटील,शंकर मराठे,डॉ.प्रशांत पाटील, प्रदीप पाटील,नरेंद्र जंजाळ,योगेश पाटील,

प्रवीण गावंडे, राजू चोपडे, एस.टि.पाटिल, प्रविण पाटिल प्रशांत भोंडे,नाना पाटील,जितू पाटील, नरेंद्र धुमाळ,आबासाहेब पाटील, किरण पाटील,विलास चव्हाण,जीवन सपकाळ,पद्माकर पाटील,प्रल्हाद बोरसे,दत्तू साबळे,भूषण कानळजे,मयुर पाटील,दशरथ पाटील,प्रभाकर पाटील,दीपक पाटील, निखिल खंडारे,जितेंद्र पाटील,बंटी पाटील,किशोर पाटील, महेंद्र बाविस्कर,अनिल बोहरा,प्रफुल्ल लोढा,मूलचंद नाईक यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार