या लग्नाची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत! स्मशानभूमीत पार पडला अनोखा विवाह सोहळा, अंत्यविधीला आलेल्या लोकांनी नववर वधूंना दिल्या शुभेच्छा.

Spread the love

वाशिम : वाशिममध्ये एका अनोख्या विवाहसोहळ्याची चर्चा सुरु आहे. स्मशानभूमीकडे माणसांना केवळ शोक किंवा जीवन मृत्यूचा मुक्तीचा मार्ग म्हणून पाहिल्या जातं. मात्र, याच समशानभूमीत चक्क विवाह सोहळा पार पडला आहे.वाशिमच्या अनसिंग इथे स्मशानभूमीमध्ये चक्क लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या अनोख्या विवाहसोहळ्याविषयी जाणून घेऊ.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या अनसिंग मोक्षधाममध्ये मसनजोगी कुटुंबिय अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र, उपेक्षती असलेल्या या समाजाच अक्ख आयुष्य मानवाच्या मारणावरती असून त्यावरच मसनजोगी कुटुंबाला त्यावर जगावं जगावं लागतं. स्मशानभूमीत असलेल्या विधी आणि देखभाल दुरुस्तीसाठी हे कुटुंब आपलं आयुष्य खर्च करत आहे. मात्र, याच मसणजोगी कुटुंबियातील ममताच लग्न हिंगोलीच्या ओमप्रकाशशी जुळले. दरम्यान, लग्नसोहळा इतर ठिकाणी करणं शक्य नसल्याने गावकऱ्यांच्या परवानगीने विवाह सोहळा स्मशानभूमी पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

एकीकडे अंत्यविधी, तर दुसरीकडे विवाह..

दरम्यान, अनसिंग गावातील एका प्रतिष्ठित नागरिकाचा मृत्यू झाला. याच वेळी एकीकडे अंत्यविधीचा कार्यक्रम तर दुसरीकडे विवाह विधीचा कार्यक्रम दोन्हीही विधी विधिवतपणे या मसनजोगी समाजातील लोकांनी आणि पाहुण्यांनी पार पाडले. प्रथम अंत्यविधी पार पाडण्यात आला तर नंतर लग्नविधी पार पडला. या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांकडून नववर वधूंना शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. सद्या या लग्नाची चर्चा पंचक्रोशी चांगलीच रंगली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी