एरंडोल :– एरंडोल विधानसभा मतदारसंघातील मोठे प्रकल्प पूर्ण होवून शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होणेसाठी जास्तीत जास्त शेत जमीन ओलिताखाली यावी, शहरी भागासह ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम मार्गी लागावा यासह पाणी प्रश्न हा कायमचा दूर व्हावा, यासाठी मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील हे सातत्याने प्रयत्न करीत होते. त्याच अनुषंगाने विद्यमान आमदार मा.अमोलदादा पाटील हे देखील त्याच दूरदृष्टीने मतदारसंघात जोमाने कार्य करीत आहेत. गेल्या काळांत भामरखेडा ल.पा.प्रकल्प, अंजनी मध्यम प्रकल्प यांसह अन्य प्रकल्पे आज देखील सुरु आहेत व लवकरच हि कामे पूर्ण होणार आहेत.
साठवण तलाव पद्मालय -2 उपसा सिंचन योजना, एरंडोल जि.जळगाव हा मध्यम प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगावअंतर्गत तापी खेाऱ्यातील गिरणा उपखेाऱ्यात एरंडोल तालुक्यातील पद्मालय गावाजवळ आहे. प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा 70.36 द.ल.घ.मी. इतका असून उपयुक्त पाणीसाठा 65.53 द.ल.घ.मी. इतका आहे. एरंडोल व धरणगाव तालुक्यातील 33 गावातील 9000 हेक्टर क्षेत्र सिंचीत करणेचे प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत माती धरणाचे 90% काम पूर्ण झालेले असून उपसा प्रणालीची व वितरण प्रणालीची सर्व कामे बाकी आहे. हि कामे पूर्ण होवून मतदारसंघातील जास्तीत जास्त क्षेत्र हे ओलिताखाली यावे यासाठी आमदार अमोलदादा पाटील हे सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करीत होते.
या प्रयत्नांना अखेर यश आले असून साठवण तलाव पद्मालय -2 उपसा सिंचन योजना, एरंडोल जि.जळगाव या प्रकल्पाचा रुपये 1072.45 कोटी किंमतीच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास दि 23/06/2025 रोजी झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू होऊन दोन वर्षात पूर्ण होणार आहे.
या प्रकल्पाचा मंजुरीमुळे सिंचनासह पिण्याचा पाण्याचा देखील प्रश्न मिटणार असल्याने आमदार अमोलदादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीशजी महाजन साहेब, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांचे आभार मानले आहेत.