तीन दिवसांवर लग्न, झिरो लाईनमन असलेल्या नवरदेवाचा विजेचा शॉक लागून मृत्यू, लग्नघरात शोककळा

Spread the love

धाराशिव :- मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तीन दिवसांवर लग्न होतं,घरात सर्वत्र आनंदाचे अनउत्साहाचे वातावरण… पाहुण्यानी घर भरलेले मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच.नवरदेवाला मृत्यूने गाठले अन लग्न घरातले वातावरण क्षणात बदलले. जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जाकेपिंपरी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

लग्न तीन दिवसांवर…

परंडा तालूक्यातील जाकेपिंपरी येथे सकाळी नऊच्या सुमारास विजेच्या खांबावरील स्विच बदलताना शॉक लागून भैरवनाथ लांडगे (२५) याचा जागीच मृत्यू झाला. तो झिरो लाईनमन म्हणून वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या हाताखाली काम करीत होता, असे सांगितले जाते.

त्याचा विवाह रविवार रोजी होणार होता. ऐन लग्नाच्या तोंडावर भैरवनाथ याचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने जाकेपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भैरवनाथ याचा मृत्यू विज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच झाला आसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलवरील स्विच बंद करताना विजेचा शॉक लागून आई, वडिलांचा एकुलता कर्त्या मुलाचा मृत्यु झाल्याने लांडगे कुटूंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात त्याची आई आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी