जळगाव : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले होते. त्यांना शिवसेनेच्या ४० आमदारांनी पाठींबा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळली. त्यानंतर राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. या सर्व घडामोडींना कोण जबाबदार यावरून आता शिवसेना नेते आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून एकोनएकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत
या सर्व प्रकरणावर बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना आमदारांच्या नाराजीची वेळोवेळी माहिती दिली, पण त्यांनी कधी समजून घेतलं नाही. शेवटी शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला. लोक ग्रामपंचायत सरपंचाची खुर्ची सोडत नाहीत. आम्ही मंत्रिपदे सोडून उठाव केला.
एक नाही तर 8 मंत्रिपदे सोडली, शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला आहे. अशा शब्दांत आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान विशेष अधिवेशनावेळी देखील त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला होता. शदर पवार यांचं एवढं वय झालं आहे तरी देखील ते सातत्याने राज्यात फिरत असतात. जयंत पाटील माझ्या मतदारसंघात येऊन गेले. एकनाथ शिंदे देखील आले. मात्र आम्हालाही वाटतं आमचे नेते मतदाससंघात यावेत मात्र तसं कधीही घडल नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हलटे होते.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






