मुंबई : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच भाजपला शिवसेना संपवायची असल्याने ते कोंबडय़ांची झुंज लावावी तसे शिवसेना आणि त्यातून फुटणाऱ्यांची झुंज लावत आहेत. झुंजीत एक कोंबडा मेला की दुसऱ्याला मारून टाकतील अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचबरोबर कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच आहे, असा इशारा ठाकरे यांनी भाजप-शिंदे गटाला दिला.
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय महासंघाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्याचबरोबर सायंकाळी जिल्हा प्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांसह पुन्हा ऑनलाइन बैठक घेतली. कितीही संकटे आली तरी संघर्ष करू, पुन्हा पक्ष नव्याने उभा करू, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या संकटाच्या काळात उत्तर भारतीय महासंघाचे पदाधिकारी तुमच्याबरोबर आहोत, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली.
रामदास कदम यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची टीका
मुंबई : हातची सत्ता गेल्यामुळे सुडाच्या राजकारणाचा भाग म्हणून भाजपनेच शिवसेनेत फूट पाडली, मात्र त्याचे खापर राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फोडले जात आहे. विनाकारण पक्षाला व पक्षाच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांना दिला. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी कदम यांच्या आरोपाचा समाचार घेतला.
हेही वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






