झुंजार । प्रतिनिधी पारोळा
पारोळा :- शहराचे आराध्य दैवत श्री प्रति तिरुपती बालाजी महाराज ब्रह्म उसत्व ला 26 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. त्यामुळे उसत्व वाची पूर्व तयारी ही कधीपासून सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने या वर्षापासून श्री बालाजी महाराजांचे निघनारे वाहनावर लाकडाऐवजी शंभर किलो वजनाचे लोखंडी सिंहासन बनवण्यात आले आहे.
शहरातील या ब्रह्मोत्सवला जवळपास पावणे चारशे वर्षाची परंपरा आहे. आजही रथ, वहने, सिंहासन, भावले हे लाकडाचे आहेत. त्यातील काही वस्तू जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे श्री बालाजी महाराज महाप्रसाद समितीचे उपाध्यक्ष रमेश भागवत यांनी वाहनावरील जीर्ण झालेला लाकडी सिंहासन हे पूर्णपणे लोखंडी बनवलेले आहे. त्यांचे स्वतःचे वर्कशॉप असल्याने त्यांनी संस्थान कडून कुठलीही या बदल्यात मोबदला न घेता स्वतः श्रमदान करून फुकटात ते सिंहासन संस्थानला बनवून दिले आहे.
जवळपास शंभर वर्षे हे सिंहासन चे आयुष्यमान राहणार आहे. श्री भागवत हे गेल्या अनेक वर्षापासून श्री बालाजी महाराज यांची सेवा विनामोबदला वेगवेगळ्या माध्यमातून देत आहेत. वहन व रथ यामागील जनरेटरची सुविधा फिटिंग आदी देखील ते मोफत करून देत आहेत. त्यामुळे त्यांची बालाजी भक्ती ही शहरात प्रसिद्ध आहे. जवळपास एक कुंटल वजनाचे हे सिंहासन आता रोज वहनावर वापरले जाणार आहे.
26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर हा उसत्व साजरा करण्यात येणार आहे. यासाठी प्रमुख विश्वस्त श्रीकांत शिंपी, माजी खासदार ए टी पाटील, डॉक्टर अनिल गुजराती, दिनेश गुजराती,प्रकाश शिंपी,केशव क्षत्रिय, तसेच महाप्रसाद समितीचे सदस्य दिलीप शिरुडकर, दत्तात्रय महाजन, किरण वाणी, सुनील पाटील, विश्वास चौधरी, प्रमोद शिरोळे, गुणवंत पाटील, बापू कुंभार, संदीप धमके, अमोल वाणी आदी त्या तयारीत गुंतले आहेत.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






