पारोळा :- सध्या शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागात देखील हीन्स्र प्राण्यांच्या हल्यानचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच वन्य प्राण्यांनी मेढ्यांच्या कळपावर हल्ला करुन १५ कोकरुंचा फडशा पाडला तर पाच कोकरु बेपत्ता आहेत. ही घटना दळवेल ता. पारोळा येथे शनिवारी रात्री घडली.
वन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दळवेल येथील संभाजी नामदेव पाटील यांच्या शेतात उतरलेल्या मेंढ्यांच्या कळपावर पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास वन्यप्राण्यांनी हल्ला चढविला. यात १५ कोकरु जागेवरच ठार झालेले तर पाच कोकरु गायब झालेले आढळून आले. पायांच्या ठशांवरुन हा वन्यप्राणी कोल्हा किंवा लांडगा असू शकतो. धुळे जिल्ह्यातील निमडाळे येथील दादा विठ्ठल टिळे यांचे व बंडू विठ्ठल टिळे यांचे प्रत्येकी पाच तर ज्ञानेश्वर लाला कोळकर यांचे १० कोकरू असे एकूण २० मेंढ्यांचे कोकरू मयत व गायब झालेले आहेत.
वनसंरक्षक रोहिणी सूर्यवंशी, वनसंरक्षक सविता पाटील, वनपाल अनिल बोराडे, वनमजूर नाना संदानशिव, विपुल सोनवणे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेश देशमुख यांनी शवविच्छेदन केले. कोकरुंची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असावी.
वन्य प्राण्यांच्या हल्यात कोकरू ठार झाल्याच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. वरिष्ठांकडे याबाबतचा अहवाल पाठविला जाणार आहे.- श्यामकांत देसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, पारोळा.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम