शेतकरी हवालदिल, सांडपाण्याचा प्रश्न अडचणीचा…
निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे.
निंभोरा बु.तालुका रावेर :- येथील बलवाडी रस्त्या लगत रेल्वे गेटला लागून असलेल्या शेती शिवारात निंभोरा गावाचे सांडपाणी साचत असते यामुळे येथील शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होते त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विहिरीतील पंप पाण्यात बुडून नुकसान होत आहे याबाबत वेळोवेळी निंभोरा बु. ग्रामपंचायतला व संबंधितांकडे कडे समस्येबाबत हा प्रश्न सुटावा म्हणून शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली होती परंतु याकडे ग्रामपंचायतीने व संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांनी ञस्त होऊन दिनांक ५. शनिवार रोजी लाक्षणिक उपोषण निंभोरा बु. ग्रामपंचायत समोर केले होते.
या उपोषणाला मंडळ अधिकारी दिपक गवई, तलाठी समीर तडवी, ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, सरपंच सचिन महाले, ग्रामपंचायत सदस्य डिगंबर चौधरी , सतीश पाटील व इतर सदस्यांनी गावातील मान्यवर व प्रतिष्ठित नागरिकांनी शेतकऱ्यांना भेट दिली होती या वेळी मंडळ अधिकारी यांनी व तलाठी ग्रामसेवक तसेच सरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकाऱ्यांनी हा शेतकऱ्यांचा शेतातून जाणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे व याबाबतचा पाठपुरावा तहसीलदार व प्रांताधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन उपोषनास बसलेले शेतकरी मुरलीधर कोळी, सुधीर मोरे ,सुभाष चौधरी, दीपक मोरे, दीपक कोंडे, सुधाकर भोगे, प्रशांत काठोके,हेमंत भंगाळे यासह शेतकऱ्यांना दिल्याने उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यानी उपोषण मागे घेतले.
उपोषणास्थळी गावातील शेतकरी राजकीय, सामाजिक व सहकार यासह विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी भेटी दिल्या होत्या.
यावेळी शेतकऱ्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न लवकर न सुटल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपोषण करते मुरलीधर कोळी सुधीर मोरे ,दिपक कोंडे, सुभाष चौधरी व आदी शेतकऱ्यांनी दिला. याप्रसंगी निंभोरा पोलीस स्टेशन तर्फे स.पो.नि.गणेश धुमाळ, स्वप्निल पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हे वाचलंत का ?
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.