विचखेडा ता.पारोळा येथील नागरिकांचा राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर रास्ता रोको, आमदार चिमणरावजी पाटील यांच्या मध्यस्तीने मिटला.

Spread the love

अधिकाऱ्यांची केली कानऊघाडणी, समस्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला महामार्ग प्रशासन जबाबदार राहील केली सूचना.
पारोळा
– तालुक्यातील विचखेडा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या सुरू असलेल्या कामामुळे नागरीक प्रचंड हैराण झाले आहेत. गावाला सर्विस रोड नाही, गावात येण्यासाठी पलीकडच्या बाजुने रस्ता नाही, जुना पुल जमीनदोस्त केल्यानंतर नदीचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी कुठलीही उपाययोजना नाही यामुळे गावातील सबंध नागरीक दैनंदिन समस्यांना तोंड द्यावे लागत होते.

यातच अजुन काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे जुन्या पुलाचा अपुर्ण कामामुळे नदी पात्रातील पाणी तसेच साचुन बऱ्याच नागरीकांचा घरात पाणी शिरून खुप मोठे नुकसान झाले, या पाण्यामुळे अनेक पशुधनधारकांचा पशुधनाचा देखील मृत्यू झाला. या रोजचा दैनंदिन त्रासाला कंटाळुन आज विचखेडा येथील विजय निकम, मा. सरपंच अशोक महाजन, सरपंच रवींद्र पानपाटील, उपसरपंच अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य पंडित पवार, सदस्य आसाराम गायकवाड ,

वि.का.सो चेअरमन राजाराम माळी, संचालक बंडू गिरधर पाटील, संचालक समाधान पाटील, संचालक पप्पू गदरी, संचालक प्रकाश चौधरी, संचालक दिलीप पाटील, संचालक विशाल पाटील, संचालक निळकंठ पाटील, संचालक डॉ भैय्यासाहेब माळी, संचालक इच्छाराम चौधरी, संचालक रमेश पाटील यांचेसह संतत्प नागरीकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला.

यावेळी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी भेट दिली असता संतत्प नागरीकांनी दैनंदिन उद्भवणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचला. या समस्यांचा आधारे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी महामार्गाच्या उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच कानऊघाडणी केली. तसेच या समस्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला महामार्ग प्रशासन जबाबदार असल्याचा सुचना देखील यावेळी केल्या. तद्नंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्विस रोड, गावात येण्यासाठी व्यवस्था व अपुर्ण अवस्थेत सोडलेल्या जुन्या पुलाचे काम तातडीने पुर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले व आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी मध्यस्ती करत हा रास्ता रोको मिटवण्यात आला.

या प्रसंगी संतप्त नागरिक शोएब दादा, शंकर चौधरी, रवींद्र शिंपी, भूषण चौधरी, गजानन पाटील, विठ्ठल पाटील, रामराव पाटील, सर्जेराव पाटील, पंडित फकीरा पाटील, शरद पाटील, दीपक सुनील पाटील, मोहित पाटील, संदीप सर्जेराव पाटील, सतिलाल तुकाराम पाटील, योगेश रामकृष्ण पाटील, मुरलीधर माळी, योगेश माळी, वना माळी, निलेश भिकन पाटील, आबा माळी पारोळा, अनिल वडार, राजेंद्र न्हावी, विलास न्हावी, आकाश न्हावी, भिकन कोळी, रावण कोळी, ऋषिकेश कोळी, दलाल भिल, संजय सुभान भिल, संजय मालचे, विजय महाले, दादा नेतकर, रामजी सूर्यवंशी, गौतम सूर्यवंशी, विकी बडगुजर, गोपाल बडगुजर,, प्रवीण बडगुजर, मधुकर कोळी, गणेश आधार माळी, मंगेश कोळी, मंगेश माळी, सुरेश शिंपी, गोविंदा माळी, रामराव पाटील, राजेंद्र रामचंद्र पाटील यांचेसह शेकडो संतप्त नागरिक उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार