संतांच्या पुतळ्यातून मिळतात जगण्याचे विचारआ. चिमणरावजी पाटील; श्री संताजी जगनाडे महाराज पुतळा अनावरण

Spread the love

पारोळा l प्रतिनिधी
राज्याचा व देशात अनेक संत, राष्ट्रपुरुष हे होऊन गेले. त्यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून आपल्यांना  जगण्याचे विचार हे प्राप्त होतात. म्हणून संतांचे, राष्ट्र पुरुषांचे पुतळे हे समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. आणि ते समाजासाठी आवश्यक देखील ठरतात असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.
शहरातील आझाद चौक येथे संताजी  जगनाडे महाराज पुतळा अनावरण व चौक सुशोभीकरण लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रम प्रसंगी आमदार पाटील हे बोलत होते.  सतीश महाले शिवसेना जिल्हाप्रमुख धुळे  हे अध्यक्षस्थानी होते. तर तेली समाजाचे जेष्ठ समाज कार्यकर्ते आनंदा गबा चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अशोक भिखा चौधरी, सुदाम रामदास चौधरी हे विशेष अतिथी तर जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल पाटील उपजिल्हाप्रमुख शिवसेना राजेंद्र चौधरी, दूध  संघ संचालक जळगाव दगडू चौधरी एरंडोल शिवसेना शहर प्रमुख आनंदा चौधरी, अनिल जगन्नाथ चौधरी, गुलाब चौधरी सह इतर मान्यवर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्याने आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नातून या विकास कामांना 50 लक्ष रुपये हे मंजूर झाले होते. आमदार चिमणराव पाटील पुढे म्हणाले की, श्री संताजी महाराज पुतळा अनावरणा चे भाग्य मला मिळाले याचा मला आनंद आहे. व तो विशेष मंगल दिवस ठरणार आहे. शहरात सध्या 110 कोटी रुपयांचे विविध विकास कामे सुरू आहेत. शिंदे सरकार मध्ये समाविष्ट झाल्याचा परिणाम म्हणून तर मतदार संघाला कोट्यावधीची विकास कामे ही मंजूर होत असून ते सुरू आहेत.आझाद चौकावर माझे विशेष प्रेम आहे. तसेच या चौकाचे देखील माझ्यावर विशेष प्रेम आहे. शहरातील माझा राजकीय श्री गणेशा येथूनच सुरू झाला आहे. देशात व राज्यात कणखर नेतृत्व असल्याने देशाची प्रगती ही अतिशय वेगाने होत आहे. कमजोर नेतृत्व हे विकास करू शकत नाही.

एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातून ते सिद्ध होत आहे. मतदारसंघात सर्व समावेशक असे विकास कामे ही सुरू आहेत.या चांगल्या कामाला गालबोट लावण्याचा देखील प्रकार काही करीत आहेत. अश्या खीळ घालणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून न देण्याचा संकल्प हा  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात केला गेला पाहिजे. निवडणुकीमध्ये विकास काम करणाऱ्याला प्राधान्य द्या चुकीचे लोक निवडल्यास आहे ती कामे देखील थांबतील व शहराचा विकास खुटेल अशी शंका आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील म्हणाले की मतदार संघात सध्या कोट्यावधी रुपयाची विकास कामे हे सुरू आहेत. शहरात इतर देखील विविध संत व राष्ट्रपुरुषांचे पुतळ्यांची निर्मिती व पुनर्निर्मिती ही केली जात आहे.

शहरातील सर्व रस्त्यांवर पथदिवे लावण्याचे देखील प्रयत्न केले जात असून शहर  अधिक सुंदर व स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शहरातील पाईपलाईन कामांमुळे रस्त्यांची तूर्त समस्या निर्माण झाली आहे. पाईपलाईनचे काम पूर्ण होताच शहरातील सर्वत्र रस्ते व गटारीची कामे केले जाणार आहेत. शहरासाठी 110 कोटी रुपयांच्या भुयारी गटारी चा प्रस्ताव हा शासनाकडे देण्यात आला आहे. कॉलनी भागांमधील खुल्या जागेवर देखील बगीचे, नाट्यगृह, स्विमिंग पूल आदी कामे सुरू आहेत. जिल्हाप्रमुख सतीश महाले म्हणाले की समाज हा किती मोठा यापेक्षा समाज हा किती एकजूट हे अधिक महत्त्वाचे ठरत असते, समाज एकजूट असेल तर त्याचा विकास हा झपाट्याने होत असतो. म्हणून शहरातील समाजाने एकजूट राहून आपला विकास कसा होईल व तो करून घ्यावा या संदर्भातील नियोजन करणे गरजेचे आहे.

प्रत्येकाला प्रत्येकाचा समाज हा प्रिय असतो आपल्या समाजाचा आदर करताना इतर समाजाचा अपमान होईल असे वर्तणूक करणे ही विकृती ठरते. पारोळा शहरात चौधरी समाजाचा नगराध्यक्ष झालेला नाही. समाजाने एकजुटीने निर्णय घेतल्यास शिवसेना वतीने ते नगराध्यक्ष स्वप्न हे चौधरी समाजाचे पूर्ण होऊ शकते असा आशावाद श्री महाले यांनी व्यक्त केला. शिवसेना शहरप्रमुख आनंदा चौधरी, कसोदा चे भास्कर चौधरी, प्रवीण चौधरी, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील चतुर पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले होते. कार्यक्रम यशस्वी साठी शहर तेली समाज पंच मंडळ व युवक कार्यकारणी व समाज बांधवांनी परिश्रम घेतले. यावेळी असंख्य नागरिक हे कार्यक्रम स्थळाला उपस्थित होते. चिमणराव पाटील यांची शिवाजी महाराज व्यायाम शाळा पासून तर कार्यक्रम स्थळ पर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. संताजी जगनाडे महाराज  पुतळा वरील रोशनाई व फटाखे आतषबाजी हे एक वेगळे वैशिष्ट्य यावेळी अनुभवायला मिळाले.

हे पण वाचा

टीम झुंजार