एक हाती सत्ता द्या विकासाचा वारु उधळू आ. चिमणराव पाटील ,कृषिरत्न पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

Spread the love


झुंजार । प्रतिनिधी पारोळा
पारोळा :- स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आले आहे. तरीसुद्धा मूलभूत समस्याच्या सामना हा करावा लागत आहे. हे चित्र बदलावयचे आहे. माझी ही आमदारकीची तिसरी टर्म आहे. दोन टर्म या विरोधी बाकावर गेल्या आहेत. आता सुदैवाने सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे विकास निधी मोठ्या प्रमाणात आणत असून तो आणण्याची ताकत आपल्याकडे आहे.

परिणामी नगरपालिका, पंचायत समिती,बाजार समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेला एक हाती सत्ता दिल्यास सर्वत्र विकासाचा वारु उधडू असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती वतीने तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषिरत्न पुरस्कार देण्यात आला त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार चिमणराव पाटील हे बोलत होते. ज्येष्ठ संचालक  चतुर पाटील हे अध्यक्षस्थानी होते. डॉ. दिनकर पाटील, रोहिदास पाटील, संघाचे अध्यक्ष गणेश पाटील, दयाराम पाटील,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर बाजार समितीचे मा सभापती शालिग्राम गायकवाड, जि प सदस्य नानाभाऊ महाजन, माजी सभापती दिलीप रोकडे, ज्ञानेश्वर आमले,शिवसेनेचे तालुका प्रमुख वासुदेव पाटील,प स माजी प्रभारी सभापती अनिल महाजन,कृनाल महाजन,सरपंच महेश पांडे,युवा सेनेचे तालुका प्रमुख बबलू पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, शहर वासीयांना आजही दुर्गंधीयुक्त पाणी हे प्यावे व वापरावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. हे चित्र बदलायचे आहे. पारोळा शहरासाठी या दोन अडीच वर्षाच्या काळातच मी पालिकेत विरोधकांची सत्ता असतानाही पाणीपुरवठा योजना, रस्ते, जलतरण तलाव आदी कामासाठी 65 ,70 कोटी रुपयांचा विकास कामांसाठी निधी आणला आहे. अजूनही भरपूर विकासनिधी हा आणता येईल. परन्तु ते सर्व विकास कामे मार्गी लागण्यासाठी पालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता असणे अतिशय आवश्यक आहे.

त्याशिवाय शहराचा विकासाचा मार्ग हा मोकळा होणार नाही.पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती ने गेल्या दहा वर्षात विकास कामांचा व उपक्रम चा माध्यमातून राज्यात नावलौकिक केला आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करून आपले शेतकरी हित आणी बिद कायम ठेवली आहे. कोरोनाच्या काळात उद्योग धंदे बंद असताना फक्त शेती क्षेत्रच अखंडित पणे सुरू होते. त्यामुळे शेतकरी आणि शेती याला अन्यनसाधारण महत्व प्राप्त होते. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रम सूत्रसंचालन प्रा आर बी पाटील यांनी केले. जि प सदस्य नानाभाऊ महाजन, माजी सभापती दिलीप रोकडे,

2009 पासून पुरस्कार वितरण
प्रास्ताविक करताना सभापती अमोल पाटील म्हणाले की,
2009 मी हाती सत्ता घेतली तेव्हा पासून आम्ही कृषिरत्न पुरस्कार वितरित करीत आहोत. आता पर्यंत 252 शेतकऱ्यांना आम्ही हे पुरस्कार वितरित करीत आहेत. विरोधकांनी साडेतीन कोटी रुपयांचे कर्ज बाजार समिती वर करून ठेवले होते. ते आम्ही पेड करून बाजार समितीला वैभव प्राप्त करून दिले आहे. तरी सुध्दा विरोधक खोटे आरोप आमच्यावर करीत आहेत. इतर निवडणुका पेक्षा त्यांना बाजार समिती ची निवडणूक का सर्वाधिक महत्वाची वाटत आहे. हे एक कोडे आहे.

टीम झुंजार