जयपूर :- विवाहित तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा दफन केलेला मृतदेह पोलिसांनी तब्बल ९ दिवसांनंतर पुन्हा बाहेर काढला आहे. ही घटना राजस्थानातील जयपूर इथं घडली असून सदर तरुणीचा मृतदेह आता सवाई मानसिंह रुग्णालयात नेण्यात आला असून तिथं शवविच्छेदन केलं जाणार आहे.पती आणि त्याच्या नातेवाईकांनी गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्या व्यक्तींनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी जयपूर इथं राहणाऱ्या २२ वर्षीय अनम या विवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. “अनम पाच महिन्यांची गर्भवती होती. ३० जुलै रोजी तिची प्रकृती एकदम चांगली होती आणि मी तिला भेटून आलो होतो. मात्र त्यानंतर सायंकाळी ५ वाजता तिची तब्येत बिघडल्याची माहिती तिच्या सासरच्या लोकांनी दिली,” असं अनमच्या वडिलांनी सांगितलं आहे.अनम आजारी असल्याचं कळताच तिच्या वडिलांनी अनमच्या सासरी धाव घेतली. परंतु अनमला उपचारासाठी रुग्णालयात हलवल्याचं तिच्या वडिलांना सांगण्यात आलं.
अनमचे वडील रुग्णालयातही पोहोचले. मात्र तिथं अनम नव्हती. दुसऱ्या दिवशी थेट तिचा दफनविधी करण्यात आला. दरम्यान, माझ्या मुलीचा तिच्या पतीने आणि सासरच्या व्यक्तींनी गळा आवळून खून केला आहे, असा आरोप अनमच्या वडिलांनी केला असून या प्रकरणाची अखेर आता पोलिसांनी दखल घेत विवाहित तरुणीचा मृतदेह ९ दिवसांनंतर बाहेर काढला आहे. शवविच्छेदन अहवालातून नेमकं काय सत्य समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे पण वाचा
- २० वर्षांपूर्वी झाले लग्न,१८ अन् १६ वर्षाची दोन मुले असलेल्या कुटुंबात झाला कलह पत्नीने गळफास घेऊन अन् दुसऱ्याच दिवशी पतीनेही रेल्वेसमोर उडी घेऊन संपविले जीवन.
- जळगाव शहरातून चोरी झालेली महागडी कार पोलीस उपनिरीक्षक व सहकाऱ्यांनी राजस्थानातून केली हस्तगत.
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.