मालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध, तिच्या बापाने शेतात नको त्या अवस्थेत पाहिलं, तरुणाला दोन दिवसं डांबलं,बेदममारहाणीत मृत्यू 10 जणांविरोधात गुन्हा दाखल.

Spread the love

बीड :- संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरून गेला होता. यानंतर बीडमधील अनेक गुन्हेगारीच्या घटनांचे व्हिडिओ समोर आले.आता पुन्हा एकदा महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. बीडमधील आष्टी तालुक्यात एका 25 वर्षीय तरुणाला दोन दिवस एका खोलीत बंद करून जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

मूळचा जालन्याचा 25 वर्षीय विकास बनसोडे बीडमधील आष्टी तालुक्यातील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक चालकाचं काम करीत होता. गेल्या चार वर्षांपासून तो इथं काम करीत होता. त्याचे भाऊसाहेब क्षीरसागर याच्या मुलीशी प्रेमप्रकरण सुरू होतं. त्या दिवशी घराच्या मागील बाजूच्या शेतात विकास आणि आपल्या मुलीला आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्यानंतर मुलीचे वडील संतापले होते पाहून भाऊसाहेब क्षीरसागर संतापले. याठिकाणी दोरी आणि वायरच्या साहाय्याने विकास बनसोडे याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे विकासचे संपूर्ण शरीर काळेनिळे पडले होते. या अमानुष मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर आरोपींनी त्याचा मृतदेह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि तिथून पळ काढला. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच विकास बनसोडे याची निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली होती.बीड पोलिसांनी याप्रकरणात एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी भाऊसाहेब क्षीरसागर, स्वाती क्षीरसागर, सुवर्णा क्षीरसागर या तिघांना पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींमध्ये समावेश असलेले बाबासाहेब क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, सुशांत शिंदे आणि बापूराव शिंदे हे अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून या सगळ्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या प्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत देखील गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हानपुडे पाटील करत आहेत.

हत्येनंतर आरोपींचा विकासच्या कुटुंबीयांना फोन

विकासला पत्र्याच्या शेडमध्ये डांबून मारहाण करत असताना आरोपींनी विकासच्या फोनवरुनच त्याच्या आई-वडिलांना फोन केला होता. त्यावेळी भाऊसाहेब क्षीरसागरने विकासच्या आईवडिलांना तातडीने आमच्या घरी निघून या, असे सांगितले. त्यांच्या फोनवरील संभाषणाची क्लीप समोर आल्याचे समजते. त्यावेळी विकासच्या आई-वडिलांनी आमच्या मुलाला आणखी मारु नका, अशी विनवणी केली. मात्र, तोपर्यंत विकासचा मृत्यू झाला होता.

मुख्य संपादक संजय चौधरी