डिव्हायडरवर धडकल्याने पहिला किरकोळ अपघात मधून वाचले, गाडीतून खाली उतरतांच भरधाव ट्रकने चिरडले 6 जणांचा जागीच मृत्यू, पहा CCTV व्हिडिओ

Spread the love

बीड:- जिल्ह्यातून एक अत्यंत हादरवणारी बातमी समोर आली आहे. तेथे एका भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या गाडीचा पहिल्यांदा अपघात झाला, त्यातून ते बचावले आणि लगेच गाडीतून खाली उतरले.मात्र काळाचा घाला त्यांच्यावर बसलाच कारण जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या त्यांना ट्रकच्या रुपाने आलेल्या यमदूताने गाठलेच आणि सहा जणांचा जीव गेला. गेवराई शहरानजीकच्या गढी पुलावर झालेला हाँ अपघाता एवढा भीषण होता, की 6 लोकं जागीच ठार झाले. या घटनेमुळे अख्खं बीड हादरलं असून मृतांच्या कुटुंबावर तर दु:खाचा अक्षरश: डोंगरच कोसळला आहे.

गेवराई येथील दिपक आतकरे यांचा मुलगा यश आतकरे आपल्या मित्रासह कारने येत असताना कार वाहनाला अपघात झाला होता. हे वाहन टोचन करुन आणण्यासाठी गेवराईतील बाळु आतकरे, भागवत परळकर, सचिन नन्नवरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव आणि दिपक सुरय्या हे वाहन टोचन करुन आणण्यासाठी गढी कारखान्यानजीक गेले होते. तिथे वाहन क्रेनने टोचन करण्यासाठी महामार्गावर ते उभे असताना बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्‍या भरधाव आयशर टेम्पोने चारचाकी वाहनाजवळ थांबलेल्या सहा जणांना जोराची धडक दिली. त्यामध्ये या सहा जणांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. आयशर टेम्पोने नंतर त्याच घटनास्थळापासून पुढे काही जणांना धडक दिली. यात अन्य दोघे जखमी झाले. अपघातानंतर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

पहिल्या अपघातातून वाचले, पण..

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. गेवराई शहराच्या जवळ असलेल्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहन डिव्हायडरवर धडकल्याने किरकोल अपघात झाला होता. त्यात कोणालाही दुखापत झाली नाही, कोणी जखमी झालं नाही. मात्र ती एसयूव्ही डिव्हायडरला धडकून तिथेच अडकल्याने ती बाहेर काढण्यासाठी गाडीत बसलेले सर्व बाहेर आले. मात्र ते रस्यावर उतरून उभे असताना त्याच महामार्गावरून जाणारा एकक ट्रक भरधाव वेगाने आला आणि त्याने उभ्या असलेल्या लोकांना जोरदार धडक दिल्याने ते खाली कोसळले आणि चिरडले गेले.हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकखाली चिरडल्या गेलेल्या सर्वांचाच मृत्यू झाला. बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे अशी मृतांची नावं आहेत. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णलयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तत्काळ धाव घेत पंचनामा केला तसेच जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. फरार ट्रकचालकाचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण बीड हादरलं आहे.

या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेने महामार्गावरील आपत्कालीन व्यवस्थेच्या अपयशावर प्रकाश टाकला आहे. महामार्गांवर अपघात झाल्यास तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे. वाहनचालकांना अपघातानंतर कसे वागावे, याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मदत करताना स्वतःची आणि इतरांची सुरक्षा कशी सुनिश्चित करावी, याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी