पारोळा :– तालुक्यातील पिंप्री प्र.ऊ. ते मोंढाळे प्र.ऊ. दरम्यान बोरी नदीवर पूल बांधकामासाठी ग्रामस्थांकडून मोठी मागणी होत होती. मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व आमदार अमोलदादा पाटील हे सातत्याने या मागणीचा पाठपुरावा शासन दरबारी करीत होते. अखेर या पाठपुराव्याला व प्रयत्नांतून पिंप्री प्र.ऊ. ते मोंढाळे प्र.ऊ. दरम्यान बोरी नदीवर मोठ्या पुलाचा बांधकामासाठी १२.०० कोटी रुपयांना मंजुरी मिळाली होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी या कामाचे भूमिपूजन मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. सद्यस्थितीत या पुलाचे पूर्णत्वास आले असून आज रोजी लोकार्पण सोहळा मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
प्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष विजुआबा पाटील, अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, मा.उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील, संचालक सुधाकरआण्णा पाटील, साहेबरावदादा पाटील यांचेसह पिंप्री, मोंढाळेसह पंचक्रोशितील स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
या पुला अभावी पिंप्री गावच्या ग्रामस्थांना किती कटाक्ष सहन करावा लागला याची मला पूर्ण जाण होती. पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटल्याने शिक्षण, आरोग्य यांसह अनेक समस्यांना ग्रामस्थांनी तोंड दिले आहे. शाळकरी विद्यार्थी, वयोवृध्द, गरोदर महिला यांची खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. गावाला येण्यासाठी रस्ताच नसल्याने कुठलीही मदत अथवा दळणवळण करणे शक्य होत नव्हते. गेल्या स्वतंत्र काळापासून या पुलाची मागणी या ग्रामस्थांकडून होत होती. हि मागणी देखील खूप रास्त आणि आपल्या ग्रामस्थांचा जिव्हाळ्याची होती. या पुलासाठी १२ कोटी रुपये एकाच वेळी मंजूर करणे हे देखील मोठ्या कसरतीचे काम होते. या पुलाचा मंजुरीसाठी किती काय करावे लागले याचे साक्षीदार आपल्या गावातील जाणकार मंडळी देखील आहे.
परंतु त्यावेळीचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांना सदरील परिस्थिती हि मा.आबासाहेब व मी लक्षात आणून दिली, त्यानंतर या पुलाचा कामासाठी १२ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली.
आज या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या ग्रामस्थांचा चेहऱ्यावरील आनंद, समाधान पाहून आपण करत असलेले राजकारण, समाजकारण सार्थकी लागल्याचे आत्मीय समाधान होत आहे. आज गेल्या स्वातंत्र्य काळापासून तब्बल ७५ वर्ष संघर्ष करून अखेर आज पुलाचे काम पूर्णत्वास आले, या कामाची पावती म्हणून या पिंप्री व मोंढाळे गावाने देखील गेल्या वेळीच्या विधानसभा निवडणुकीत भरभरून प्रेम दिले, या कामाची पावती मला आपण या निवडणुकीत दिलेल्या आशीर्वादाने दिलीच आहे, परंतु आपण यावरच न थांबता येत्या काळात उर्वरित कामांना देखील प्राधान्याने पूर्ण करून गावाचा सर्वांगीण विकासासाठी यातून साधणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांना आश्वासित केले.