चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.

Spread the love

चोपडा :- पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते.पंढरपूरला जाऊन विठ्ठूरायाचे दर्शन ‘याची देही याची डोळा घेणे’ म्हणजे वारी. 18 ते 20 दिवस सर्व संसारीक वैभव, सुख सोडून फक्त ईश्वराच्या सानिध्यात राहणे म्हणजे वारी. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेचा वारसा म्हणून पंढरपूरच्या वारीसाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाई च्या दर्शनासाठी जातात.

तसेच चोपडा नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी हे सुद्धा मनात भक्तिभाव घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी सायकलीने वारीसाठी चोपडा जळगाव येथून निघाले आहेत.ही केवळ धार्मिक तीर्थयात्रा नाहीये.तसेच महाराष्ट्रात या वारीला अनन्यसाधारण सांस्कृतिक महत्व असून पंढरपूरच्या वारीमध्ये विविध जाती धर्माचे समुदायाचे व प्रदेशातील लोक वारी करीत असतात.यामुळेच एकता आणि बंधुत्वाची भावना जोपासली जाते.

मुख्याधिकारी राहुल पाटील हे चोपडा येथे जवळपास एक वर्षापूर्वी हजर झालेत.तेव्हापासून विविध समाजहिताचे निर्णय,सफाई कामगार यांच्या गुणवंत लेकरांना शालोपयोगी साहीत्य,आर्थिक मदत,शहरातील विकासाचे कामे स्वतः उभे राहून उत्कृष्ट प्रकारे करून घेतात.राहुल हे उत्तम अशी चित्रकार, व संगीतकार ही आहेत.त्यांच्या लहानश्या चिमुकलीसोबत नाशिकच्या देवधान किल्ल्यावर चढाई करून अनोखा विक्रम नोंदविला आहे.शिवजयंती, गणेशोत्सव व नवरात्रीत छान पेंटींग करून व शाडोमातीची गणपतीची मूर्ती देखील त्यांनी बनवून पर्यावरण पूरक संदेश दिला.जिल्ह्यातील 100टक्के वसुली करण्यात ही चोपडा नगरपरिषदेचा प्रथम क्रमांक त्यांनी मिळवून एक आदर्श मुख्याधिकारी म्हणून नावलौकिक मिळविले आहे.
यावेळी मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या आईनी औक्षण करून आशीर्वाद दिले. राहुल पाटील यांच्या विविध उपक्रमांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून पंढरपूर च्या वारीला सायकलीने जाणारे ते पहीले मुख्याधिकारी म्हणून ही त्यांची नोंद आता केली जाईल.

मुख्य संपादक संजय चौधरी