मंजूर जलकुंभाचे काम त्वरीत सुरू करा जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
पारोळा :-
शहराकरीता शासनाच्या नगर विकास विभागामार्फत वैशिष्ठयपूर्ण योजने अंतर्गत मंजूर जलकुंभाचे काम त्वरीत सुरू करावे असे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख डाॅ हर्षल माने व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले.याबाबत मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्योती भगत यांना दोन वेळा निवेदन देऊन देखील अद्याप पावोतो कुठलीही कार्यवाही करण्यात आली नव्हती.

शहराची वाढती लोकसंख्या पाहता पिण्याच्या पाण्याची साठवणूक क्षमता वाढवण्याकामी सध्या असलेली जलकुंभाची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे या करिता शासनाकडून निधी उपलब्ध करून देणे बाबत. मा. ना.एकनाथजी शिंदसाहेब नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे दि. २७-१०-२०२१ निधीची मागणी केली त्यावर त्यांनी तात्काळ मंजुरी देऊन शासनाच्या नगर विकास विभागा मार्फत वैशिष्ठयपूर्ण योजने अंतर्गत या नवीन जलकुंभ उभारणे कामासाठी १ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.या बाबत शासन निर्णय क्र.नपावे-२०२१/प्र.क्र.२०१(५) नवि-२६ जळगाव-११-२०२१ रोजी आदेश सम्बन्धीतांना दिले आहेत.

पारोळा शहरासाठी लागणारे पिण्याचे पाणी तामसवाडी धरणातून जलवाहिनी व्दारे पारोळा शहराला पुरविले जाते धरणात पाण्याचा पुरेसासाठा असतांनाही शहरातील नागरिकांना १० ते १२ दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो या जलकुंभ उभारणी नंतर शहराला किमान दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा करणे सहज शक्य होईल सध्या शहराला एका झोन करिता अंदाजे २५ लक्ष लिटर पाण्याची गरज पडते व सद्या न.पा.कडील असलेले जलकुंभ ११+११-२२ लक्ष लिटर एव्हड्या क्षमतेचे आहेत दोघे जलकुंभ मिळून देखील एका झोनचे पाणी पूर्ण होत नाही व दोघे जलकुंभ भरून खाली होई पर्यंत पर्यायी साठा करण्याची सुविधा नसल्यामुळे बराचसा वेळ वाया जातो.

शहरातील लोकसंख्या व नवीन वसाहती वाढल्यामुळे एकवेळ पाणी पुरवठा करण्यास २१-२२ झोन मध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो म्हणजे एका दिवसात २ झोन झाल्यास १२ दिवसात संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पूर्ण होतो.नवीन जलकुंभ उभारल्यास पाण्याचा पर्यायी साठा करणेस शक्य होईल व वितरणावर पडणारा ताण कमी होऊन शहराला २ ते ३ दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होऊ शकते नगर परिषदेने शासनाच्या नगरोत्थान महाभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजना सादर केलेली आहे या योजनेस नवीन वाढीव अंदाज पत्रक करून तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मान्यता त्यावर निधीची तरतूद व लोक सहभागाचा हिस्सा अश्या सर्व बाबींना बराच कालावधी लागणार आहे.

तो पर्यन्त उपलब्ध असलेल्या निधी मधून जलकुंभाचे काम करणे लोकहिताचे व अत्यांवश्यक आहे
तरी वरील कामासाठी मिळालेला निधी २०२२ अखेर पर्यंत खर्च करणे गरजेचे असल्याने सदर काम महाराष्ट्र शासनाच्या जीवन प्राधिकरण संस्थेकडे वर्ग करून लवकरात लवकर ईस्टीमेट व तांत्रिक मंजुरी देऊन मंजूर जलकुंभाचे काम त्वरीत सुरू करावे असे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख डाॅ हर्षल माने व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

टीम झुंजार