झुंजार प्रतिनिधी । पारोळा
पालकांनो,विवेकानंद एका दिवसांत घडत नाही.उद्याचा विवेकानंद घडविण्यासाठी आपल्या मुलांच्या गुण-अवगुणांवर जातीने लक्ष देवून त्यांचे चिंतन मनन केले पाहिजे.असे आवाहन एरंडोल येथील प्रसिद्ध विधिज्ञ अँड मोहन शुक्ला यांनी पालकांना केले. येथील राज्य आदर्श शिक्षक स ध भावसार यांच्या वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ गुणवंताचा पारितोषिक वितरणाचा सोहळा केशव पतसंस्थेच्या सभागृहात रविवारी घेण्यात आला.त्यात अँड.मोहन शुक्ला अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
व्यासपीठावर ऍड कवी विलास मोरे,राज्य आदर्श शिक्षक स ध भावसार,माजी मुख्याध्यापक बी एस भावसार उपस्थित होते. अँड.मोहन शुक्ला पुढे म्हणाले की, पालकवर्ग संसाराच्या राहातगाड्यात एवढे गुंततात की,त्यांना आपल्या मुलांकडे अजिबात लक्ष द्यायला वेळ नसतो.आपल्या मुलांच्या शिक्षकांना भेटून गुण-अवगुणांचा मागोवा घेवून चर्चा केली पाहिजे.चिंतन मनन केले पाहिजे.व्यक्तिमत्त्व विकासासाठी पालक
काहीच करीत नाहीत.अशी खंत व्यक्त करीत उद्याचा विवेकानंद येणार कुठून.?असा सवाल पालकांना केला.आत्मसन्मान गमावून स्वतःला कधीही सन्मानित करून घेऊ नका.मनाची मुरड घालून मनाविरुद्ध काहीही करू नका ज्याच्यात स्वारस्य आहे.तेच काम पूर्ण क्षमतेने करा.स्वप्न मोठी पहा आणि ती साकार करण्यासाठी कठोर मेहनत घेवून जिद्दीने स्वप्न साकार करा असा सल्ला विद्यार्थ्यांना अँड.मोहन शुक्ला यांनी दिला.
दुःखाचे मूळ कारण राग द्वेष आणि मत्सर आहे. त्याला ९० टक्के मिळाले मला का नाही? मला ९५ मिळाले त्याला ९८ का.? विद्यार्थ्यांनी मनातून राग द्वेष आणि मत्सर काढायला हवा तरच आनंद फुलेल.जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूवर नितांत श्रद्धा असली पाहिजे.गुरूवर विश्वास आणि श्रद्धा असली तरी विद्यार्थी मागे राहू शकत नाहीत.स्वतःवर आत्मविश्वास असला तर आकाशा छिद्र पाडून पुढे जावू शकता परिणामी आत्मविश्वास जिद्द चिकाटी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता असा आशावाद कवी ऍड विलास मोरे यांनी व्यक्त केला.
पैशापेक्षा वेळ महत्वाची..!
पैशापेक्षा वेळ जास्त महत्वाची आहे.कारण गेलेला पैसा आपण परत मिळवू शकतो मात्र गेलेली वेळ मिळवता येत नाही.म्हणून जीवनात शिस्त फार महत्वाची आहे.इंग्रजांनी केवळ शिस्तीमुळे १५० वर्ष राज्य केले इंग्रजांचा दाखला देवून राज्य आदर्श शिक्षक भावसार यांनी शिस्तीचे महत्व विषद केले.
८१ गुणवंताचा सन्मान
दहावी आणि बारावीतील विज्ञान वाणिज्य कला शाखामधील प्रथम द्वितीय आणि तुतीय आलेले तसेच विविध क्षेत्रातील तब्बल ८१ गुणवंताचा रोख बक्षीस शाल श्रीफळ नारळ गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तर राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय भावसार यांनी नुकतीच पीएचडी पदवी प्राप्त झाल्याने तर दै.तरुण भारत’चे तालुका प्रतिनिधी विशाल महाजन यांचे तरुण भारतचे सर्व खानदेश मधील प्रतिनिधींमधून टॉप ‘थ्री’ मध्ये सन्मान झाल्याने आदर्श शिक्षक भावसार यांच्या तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अर्चना कासार तर आभार स ध भावसार यांनी मानले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अ. दे.भामरे,दीपक भावसार,एस एस पाटील यांनी परिश्रम घेतले.
आपण हे वाचले का?
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले