चिखला काकड येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महात्या…

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- तालुक्यातील चिखला या गावात सततच्या नापिकीला कंटाळलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे आज ८ ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे.

संपत नागरे (वय४०,रा.चिखला काकड ) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.विठ्ठल नागरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत.सततच्या नापिकीला ते कंटाळले होते.त्यामुळे आज घरातले इतर लोक शेतात गेलेले असताना त्यांनी गळफास घेतला.घटनेची माहिती मिळताच बिबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण,पोकॉ रोहिदास पांढरे करीत आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार