झुंजार प्रतिनिधी पारोळा
शहरात विजेची समस्या ऐरणीवर आली आहे. दिवसभरात तब्बल १० ते १५ वेळा लाईट चालू बंद होते.यामुळे अनेक कामांना ब्रेक लागून अनेकांचे टीव्ही,कॉम्पुटर,लॅपटॉप खराब झाले आहेत.ब्राह्मोत्सव पर्यत विजेची समस्या न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिवछावा संघटनेचे सागर भोसले यांनी दिला आहे.
विजेची समस्या गंभीर बनली आहे.अनेक कामांना ब्रेक लागला आहे.दिवसातून अनेकदा लाईट चालू बंद होत असल्याने टीव्ही,लॅपटॉप,कॉम्पुटर्स,पंखे खराब झाले आहेत.परिणामी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.लाईट केव्हा येणार.? काय समस्या आहे.? चौकशीसाठी वीज वितरण कर्मचारी अधिकारी यांना फोन केले तर उचलत नाहीत.असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
परिणामी लाईट गुल अधिकारी कर्मचारी मश्गुल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.विजेचा लपंडावाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ब्राह्मोत्सव पर्यत विजेची समस्या न सुटल्यास तीव्र निषेध नोंदवून आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी,तालुकाध्यक्ष गणेश पाटील,शहराध्यक्ष ईश्वर पाटील,मनोज खत्री,लोकेश महाजन उपस्थित होते.
–वीज समस्येवर स्वाक्षरी मोहीम
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या अनेक कामांना ब्रेक लागला आहे.तर काहींची विद्युत उपकरणे देखील खराब झाली आहेत.सततच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे परिणामी तरुणाईकडून या वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवून अधिकाऱ्याना निवेदन देवून तक्रारींचा पाढा वाचण्यात आला.ब्राह्मोत्सव पर्यत समस्या न सुटल्यास जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल असा सज्जड दम तक्रार समनव्यक राहुल निकम यांनी भरला.यावेळी माजी नगरसेवक दीपक अनुष्ठान, डाँ.चेतन करोडपती,गौतम जावळे, निंबा मराठे आदी उपस्थित होते.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम