झुंजार प्रतिनिधी पारोळा
शहरात विजेची समस्या ऐरणीवर आली आहे. दिवसभरात तब्बल १० ते १५ वेळा लाईट चालू बंद होते.यामुळे अनेक कामांना ब्रेक लागून अनेकांचे टीव्ही,कॉम्पुटर,लॅपटॉप खराब झाले आहेत.ब्राह्मोत्सव पर्यत विजेची समस्या न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिवछावा संघटनेचे सागर भोसले यांनी दिला आहे.
विजेची समस्या गंभीर बनली आहे.अनेक कामांना ब्रेक लागला आहे.दिवसातून अनेकदा लाईट चालू बंद होत असल्याने टीव्ही,लॅपटॉप,कॉम्पुटर्स,पंखे खराब झाले आहेत.परिणामी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.लाईट केव्हा येणार.? काय समस्या आहे.? चौकशीसाठी वीज वितरण कर्मचारी अधिकारी यांना फोन केले तर उचलत नाहीत.असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
परिणामी लाईट गुल अधिकारी कर्मचारी मश्गुल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.विजेचा लपंडावाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ब्राह्मोत्सव पर्यत विजेची समस्या न सुटल्यास तीव्र निषेध नोंदवून आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी,तालुकाध्यक्ष गणेश पाटील,शहराध्यक्ष ईश्वर पाटील,मनोज खत्री,लोकेश महाजन उपस्थित होते.
–वीज समस्येवर स्वाक्षरी मोहीम
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या अनेक कामांना ब्रेक लागला आहे.तर काहींची विद्युत उपकरणे देखील खराब झाली आहेत.सततच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे परिणामी तरुणाईकडून या वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवून अधिकाऱ्याना निवेदन देवून तक्रारींचा पाढा वाचण्यात आला.ब्राह्मोत्सव पर्यत समस्या न सुटल्यास जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल असा सज्जड दम तक्रार समनव्यक राहुल निकम यांनी भरला.यावेळी माजी नगरसेवक दीपक अनुष्ठान, डाँ.चेतन करोडपती,गौतम जावळे, निंबा मराठे आदी उपस्थित होते.
हे पण वाचा
- Viral Video:नवरीला लागली हळद,रात्री नाचताना नवरीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,ज्या दिवशी तिचे लग्न त्याच दिवशी निघाली अंत्ययात्रा, दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा
- चुलत दीरासोबत अनैतिक संबंध, पती पत्नीमध्ये वाद, प्रियकराच्या मदतीने पत्नीने शेतकरी पतीचा केला खून; अन् अपघाताच्या केला बनाव.
- घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाने घेतले भिकाऱ्याचे सोंग; पंचायत समिती कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन.
- नवरदेव वऱ्हाडीसह लग्नासाठी मांडवात आला, अचानक मधमाशांनी केला हल्ला,नवरदेव नवरीला घेऊन पळाला,19 वऱ्हाडीं जखमी.
- दुसऱ्या तरुणाशी लग्न का केलं अस म्हणत नवविवाहित दाम्पत्याची कार अडवून नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच….