मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : गुरुवारी झालेल्या दुसर्या टी२० विश्वचषकाच्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा ५६ धावांनी पराभव केला. भारत या विजयानंतर गट २ च्या शीर्षस्थानी विराजमान झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २ बाद १७९ धावा केल्या. विराट कोहलीने ४४ चेंडूत नाबाद ६२ धावा, रोहित शर्नाने ३९ चेंडूत नाबाद ५३ धावा आणि सूर्यकुमारने २५ चेंडूत नाबाद ५१ धावा काढल्या. के. एल राहुल सलग दुसर्या सामन्यात अपयशी ठरला तर विराटने सलग दुसरे अर्धशतक झळकावले.
नंतर नेदरलँड्सला २० षटकांत १२३/९ थोपवले. नेदरलँड्सकडून टीम प्रिगलने (२०) सर्वाधिक धावा केल्या. भारतासाठी भुवनेश्वर कुमार (२/९) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, तर अक्षर पटेल (२/१८), रवीचंद्र अश्विन (२/२१), अर्शदीप सिंग (२/३७) आणि महंमद सामी (१/२७) यांनी चांगली साथ दिली.
भारताकडून रोहित शर्माने आजवर ३४ षटकार टी२० विश्वचषक स्पर्धेत मारत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सूर्यकुमारला त्याच्या जलद नाबाद ५१ धावांसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……