मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : पावसामुळे बांगलादेशच्या डावातून चार षटके कमी करण्यात आली त्यामुळे त्यांना १६ षटकांमध्ये १५१ धावांची गरज होती. पावसानंतर सुरू झालेल्या सामन्यात बांगलादेशने घाईघाईत विकेट गमावल्यामुळे भारत पुन्हा अव्वल स्थानावर आहे. बुधवारी अॅडलेडमध्ये सुपर १२ चा सामना झाला. लिटन दास ६० धावांवर धावबाद झाल्यानंतर विकेट पडण्यास सुरुवात झाली.
लवकरच मोहम्मद शमीने भारताला दुसरा विजय मिळवून दिला. त्यानंतर अर्शदीप सिंगने एकाच षटकात दोघांना आणि पुढील षटकात हार्दिक पंड्याने दोघांना बाद केले. दरम्यान, भारताच्या २० षटकांत ६ बाद १८४ धावांच्या प्रत्युत्तरात लिटनने बांगलादेशला दमदार सुरुवात करून दिली. पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी त्याने २१ चेंडूत ५० धावांची खेळी केली. तत्पूर्वी, विराट कोहलीने ४४ चेंडूंत नाबाद ६४ धावा केल्या.
विराटने चार सामन्यात तिसरं अर्धशतक लगावले. केएल राहुलने देखील सलामीला जोरदार खेळी खेळली आणि ३२ चेंडूत ५० धावा केल्या. राहुलने अखेर अर्धशतक झळकावले. बांगलादेशकडून हसन महमूद (३/४७) याने सर्वोत्तम गोलंदाजी केली. भारताने बांगलादेशला १४५/६ पर्यंत रोखले. भारताकडून अर्शदीप सिंगने (२/३८) बळी घेतले. विराट कोहलीला (४४ चेंडूत नाबाद ६४) सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






