मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : पावसामुळे बांगलादेशच्या डावातून चार षटके कमी करण्यात आली त्यामुळे त्यांना १६ षटकांमध्ये १५१ धावांची गरज होती. पावसानंतर सुरू झालेल्या सामन्यात बांगलादेशने घाईघाईत विकेट गमावल्यामुळे भारत पुन्हा अव्वल स्थानावर आहे. बुधवारी अॅडलेडमध्ये सुपर १२ चा सामना झाला. लिटन दास ६० धावांवर धावबाद झाल्यानंतर विकेट पडण्यास सुरुवात झाली.
लवकरच मोहम्मद शमीने भारताला दुसरा विजय मिळवून दिला. त्यानंतर अर्शदीप सिंगने एकाच षटकात दोघांना आणि पुढील षटकात हार्दिक पंड्याने दोघांना बाद केले. दरम्यान, भारताच्या २० षटकांत ६ बाद १८४ धावांच्या प्रत्युत्तरात लिटनने बांगलादेशला दमदार सुरुवात करून दिली. पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी त्याने २१ चेंडूत ५० धावांची खेळी केली. तत्पूर्वी, विराट कोहलीने ४४ चेंडूंत नाबाद ६४ धावा केल्या.
विराटने चार सामन्यात तिसरं अर्धशतक लगावले. केएल राहुलने देखील सलामीला जोरदार खेळी खेळली आणि ३२ चेंडूत ५० धावा केल्या. राहुलने अखेर अर्धशतक झळकावले. बांगलादेशकडून हसन महमूद (३/४७) याने सर्वोत्तम गोलंदाजी केली. भारताने बांगलादेशला १४५/६ पर्यंत रोखले. भारताकडून अर्शदीप सिंगने (२/३८) बळी घेतले. विराट कोहलीला (४४ चेंडूत नाबाद ६४) सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






