दुर्दैवी घटना! नळाचं पाणी भरत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू.

Spread the love

जालना: नळाचं पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोकरदन शहरात घडली आहे. नम्रता संदीप सुरडकर असे या मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. नम्रताच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

नळाला आज सकाळी पाणी आल्यानंतर नम्रताने पाणी भरण्यासाठी विद्युत मोटर सुरू केली. नम्रता नळावरून पाणी भरत होती. याचदरम्यान तिचा तिथे पडलेल्या इलेक्ट्रिक वायरला स्पर्श झाला. इलेक्ट्रिक वायरला स्पर्श होताच तिला विजेचा जोरदार धक्का बसला.

नम्रता हिला तत्काळ शहरातील एक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. नम्रताच्या अकाली निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. नम्रता दहावीच्या वर्गात शिकत होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार