धान्य विकायला गेला तो परतलाच नाही! तरुणाचा अपघाती मृत्यू.

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी .

धरणगाव :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात एक युवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गावोगावी जाऊन धान्य विक्री करणाऱ्या तरुणाची रिक्षा रस्त्यात बंद पडली. बंद रिक्षाला भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. धरणगाव चोपडा रोडवरील कमल जिनिंगजवळ रविवारी सकाळी ही घटना घडली आहे.
जळगाव: गावोगावी जाऊन धान्य विक्री करणाऱ्या तरुणाची रिक्षा रस्त्यात बंद पडली. बंद रिक्षाला भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. धरणगाव चोपडा रोडवरील कमल जिनिंगजवळ रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. आशिष गजानन भावसार (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे.

धरणगाव शहरातील पारोळा नाका परिसरात भावडू उर्फ आशिष गजानन भावसार हा वास्तव्यास आहे. आशिष हा ग्रामीण भागात किरकोळ धान्य विक्रीचा व्यवसाय करत होता. नेहमीप्रमाणे तो आज खेडेगावावर जात असताना सकाळी ८.३० वाजता त्याची रिक्षा (एमएच १५ ईजी ६३०५) ही चोपडा रोडवरील कमल जिनिंगजवळ अचानक बंद पडली. याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने बंद पडलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. यात अशिषच्या डोक्याला व पायाला जबर दुखापत झाली. अपघातानंतर जखमी अवस्थेत आशिषला जळगाव येथील रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

चार बहिणींचा एकुलता एक भाऊ


आशिषचे पितृछत्र बालपणीच हरवलेले होते. तो चार बहिणींचा एकुलता एक भाऊ असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. आशिष मितभाषी आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहायचा. तो प्रचंड कष्टाळू होता. त्यामुळे या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार