जळगाव : – गणपती विसर्जन करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कांताई बंधाऱ्यात घडली. भगवान नामदेव राठोड (वय-१८, रा. समता नगर जळगाव) असं मृत तरूणाचं नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान राठोड हा आपल्या आई आणि मोठा भाऊ यांच्यासोबत समता नगरात वास्तव्याला होता. शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास समता नगरातील गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी मंडळाच्या तरूणांसोबत भगवान राठोड हा गिरणा नदीवरील कांताई बंधारा येथे गेला होता. यावेळी तरूणांसोबत भगवान देखील पाण्यात उतरला. दरम्यान, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने वाहत्या पाण्यात पाय घसरून तो पडला.
यावेळी उपस्थित तरूणांनी आरडा-ओरड केली. त्यानंतर भगवानला पाण्याच्या बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले. मृत भगवान राठोड याच्या पश्चात आई, मोठा भाऊ विष्णू, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






