प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंद नगर :- ( ता. इंदापूर ) बहुजन समाज पार्टी इंदापूर
विधानसभेच्या वतीने बहुजन नायक मान्यवर काशीरामजी साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आणि आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन आज दिनांक 11/9/ 2022 रोजी सकाळी 11 वाजता वालचंदनगर या ठिकाणी केले होते. या बैठकीस मार्गदर्शक म्हणून बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माननीय अजितजी ठोकळे साहेब पुणे जिल्हाध्यक्ष रमेशआप्पा गायकवाड साहेब जिल्हा कोषाध्यक्ष श्रीपती दादा चव्हाण हे उपस्थित होते . बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर या देशांमध्ये बहुजन समाजाच्या आंदोलनाची एक दिशा ठरवली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय सत्ता ही मास्टर चावी असून ती हस्तगत केल्याशिवाय दलित बहुजन मागासवर्गीयांचे समस्या सुटणार नाही.
बाबासाहेबांच्या आदेशाला प्रमाण मानून बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून देशभरामध्ये बहुजन समाज जागृत केला आणि बहुजन समाज पार्टीला देशातली तिसऱ्या नंबरची पार्टी बनवली ऋषीमुनींच्या धरतीवरती उत्तर प्रदेशांमध्ये निळा झेंडा आणि हत्ती निशाणीचे चार चार वेळा सरकार बनवून दलित मागासवर्गीय बहुजन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या महामानवाचा स्मृतिदिन 9 ऑक्टोबरला असून त्या स्मृतिदिन साजरा करण्यासाठी बहुजन समाज पार्टी द्वारे कार्यक्रमाचे नियोजन केले गेले त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेे
यावेळी बहुजन समाज पार्टीचे लोकसभा प्रभारी प्रदीप साबळे ,विधानसभा अध्यक्ष संतोषजी सवाने ,उपाध्यक्ष मनेश कांबळे , महासचिव दीपक सावंत ,कोषाध्यक्ष आनंद फडतरे, बाबासाहेब सावंत ,डॉ. प्रफुल्ल लोंढे, संकेत वाघमारे, बाळासाहेब सवाने ,महिला कार्यकर्त्या ज्योती मोकळ व सर्व विधानसभेचे पदाधिकारी कार्यकर्ता हितचिंतक सदर बैठकीस उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- Viral Video:नवरीला लागली हळद,रात्री नाचताना नवरीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,ज्या दिवशी तिचे लग्न त्याच दिवशी निघाली अंत्ययात्रा, दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा
- चुलत दीरासोबत अनैतिक संबंध, पती पत्नीमध्ये वाद, प्रियकराच्या मदतीने पत्नीने शेतकरी पतीचा केला खून; अन् अपघाताच्या केला बनाव.
- घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाने घेतले भिकाऱ्याचे सोंग; पंचायत समिती कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन.
- नवरदेव वऱ्हाडीसह लग्नासाठी मांडवात आला, अचानक मधमाशांनी केला हल्ला,नवरदेव नवरीला घेऊन पळाला,19 वऱ्हाडीं जखमी.
- दुसऱ्या तरुणाशी लग्न का केलं अस म्हणत नवविवाहित दाम्पत्याची कार अडवून नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच….