आदिवासी बांधवांना न्याय व हक्क मिळवून देणार आ. चिमणरावजी पाटील, महाराजस्व अभियान अंतर्गत जातीचे दाखले व रेशनकार्डाचे वाटप

Spread the love


झुंजार प्रतिनिधी एरंडोल
एरंडोल :-
आदिवासी बांधवांना न्याय व हक्क मिळवून देणार आदिवासी बांधवांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार चिमणराव पाटीलयांनी महा राजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत रेशन कार्ड व जातीचे दाखले वाटप प्रसंगी व्यक्त केले
एरंडोल येथील केवडी पुरा भागात आदिवासी बांधवांना महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी या कार्यक्रमा प्रसंगी जवळपास 100 रेशन कार्ड व 300 जातीचे दाखले वितरण समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना आ. चिमणराव पाटील म्हणाले आदिवासी बांधवांना स्वतःचे जागाव स्वतःचे व हक्काचे घर मिळावे या साठी आपण पूर्णपणे प्रयत्नशील आहोत

परंतु यासाठी लागणाऱ्या कागद पत्राची पूर्तता करावी एरंडोल येथे आदिवासी प्रादेशिक उप विभागीय कार्यालय व्हावे यासाठी आपले प्रयत्न सुरू असून लवकर सदर कार्यालय सुरू होईल आदिवासी बांधवांची दफन विधी चा जागेची समस्या आहे त्यावर त्यांनी प्रांत अधिकारी विनय गोसावी यांना सदर जागेबाबत सूचना केल्या आदिवासी बांधवांनी शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे आदिवासी बांधवांच्या पाठीशी आपण सदैव उभी असून यापुढेही आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू अशा आश्वासन दिले मी कोणत्या गटाचा तटाचा याकडे कधीही मी लक्ष दिले नसून फक्त माझा मतदार संघाचा विकास झाला पाहिजे आणि त्याचेच फळ दोन महिन्यां मध्ये माझे स्वप्नातील अंजनी मध्यम प्रकल्प व पद्मालय प्रकल्पासाठी सहाशे दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला या साठीच मी प्रयत्नशील होतो

आणि भविष्यातही या मतदारसंघाचा चेहरा मोहरा आपण बदलणार असल्याचेही ते यावेळी. म्हणाले तसेच त्यांनी पंढरीनाथ मोरे यांचे खास करून कौतुक केले
या कार्यक्रमाला आदिवासी प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकारी विनिता सोनवणे यांनी मार्गदर्शन केले तर उपविभागीय अधिकारी विनायक गोसावी यांनी आजचे उपक्रमाचा श्रेय आ चिमणराव पाटील यांना जाते यांनीच वेळोवेळी आदिवासी बांधवांच्या समस्यांसाठी आम्हाला सूचना केल्या व त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही हे काम करू शकलो तसेच आता पर्यंत एरंडोल तालुक्यात तीन ठिकाणी कार्यक्रम घेऊन 800 रेशन कार्ड व 1200 जातीच्या दाखल्या चे वाटप आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले आहे असे यावेळी म्हणाले कार्यक्रमाला चोपडा साखरी धुळे यावल येथील पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच आदिवासी बांधवांच्या लोकप्रतिनिधी बाबत निषेधही व्यक्त केला

सर्वप्रथम चिमणराव पाटील यांच्या आगमन प्रसंगी युवकांनी आदिवासी नृत्य सादर केले त्यानंतर वीर एकलव्य यांच्या पुतळ्यास आमदार चिमणराव पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांडतांना पंढरीनाथ मोरे म्हणाले की अत्यंत कमी अवधी मध्ये तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील प्रांताधिकारी विनय गोसावी व तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी सहकार्य करून अशिक्षित असलेला या आदिवासी समाजाच्या नागरिकांना रेशन कार्ड व जातीच्या दाखल्याचे मिळाले आहेत.नागरिकांना रेशन कार्ड मिळाले परंतु रेशन दुकानदारांकडे माल मिळत नाही त्यासाठी आपण रेशन दुकानदारांचा इंष्टाक वाढवून त्यांना वाढीव माल देण्यात यावा यामुळे नागरिकांना रेशन मिळेल. असे ते म्हणाले.

यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, तहसीलदार सुचिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी बाजार समिती माजी सभापती शालीग्राम गायकवाड जळुचे माजी सरपंच रवींद्र जाधव युवा सेनेचे माजी तालुकाध्यक्ष बबलू पाटील चिंतामण पाटील आनंद दाभाडे विठ्ठल आंधळे राजेंद्र महाजन जावेद मुजावर मयूर महाजन संजय चौधरी यांच्यासह दीपक अहिरे भारत बोरसे नगरपालिका अभियंता शिंदे, कृष्णा ओतारी राजू धनगर, भोला महाले, किशोर ठाकरे, शिवदास सोनवणे, योगेश मालचे, भूषण भिल,

सुनील सोनवणे,राजेश मालचे, सुनील मोरे, संतोष सोनवणे,आबा भिल, उत्तम भिल, संभाजी पवार, गुलाब सोनवणे, बुधा सोनवणे, गोकुळ गायकवाड, शंकर भिल एकनाथ गायकवाड, भाऊसाहेब सोनवणे, सोमनाथ सोनवणे, सुभाष सोनवणे, कांतीलाल बारेला यांचेसह आदिवासी टायगर सेना व ए.टी.एस. चे कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंढरीनाथ मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर ठाकरे यांनी केले


टीम झुंजार