झुंजार । प्रतिनिधी
पारोळा – किरणकुमार बकाले, स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखा, जळगांव यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. हि अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्यातील नव्हे तर देशातील संपूर्ण मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच एखाद्या समाजाबद्दल एवढ्या विकृत आणि विषारी भावना घेऊन एखादा अधिकारी निलंबनानंतरही भविष्यकाळात काम करतांना
त्या समाजाबद्दल कायम सुडाच्या भावनेने कारवाई करील. म्हणून अश्या मुजोर अधिकाऱ्याला सेवेतुन निलंबीत करणे हा थातूर मातुर उपाय न करता त्यास कायम सेवेतुन बडतर्फ करून घरी बसवावे अशी मागणी
आमदार चिमणरावजी पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक,डॉ बी जी शेखर पाटील जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे यांचेकडे केलेली आहे.