रावेर : – रावेर तालुक्यातीलचिनावल-उटखेडा दरम्यान असलेल्या सुकी नदीच्या पुलाखाली आज दि. १६ सप्टेंबर शुक्रवारी रोजी सकाळी तब्बल २२ बैल कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, हे बैल लंपीमुळे मृत झाले की, अन्य कारणाने ? याची माहिती अद्याप कळलेली नाही. या मार्गावरून गुरांची आंतरराज्यीय तस्करी देखील मोठ्या प्रमाणात होत असते. यातील एखाद्या वाहनात गुरे गुदमरून मेली असल्याने त्यांना नदीपात्रात टाकले असावे का ? अशी शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे. कारण, यातील काही गुरांच्या गळ्याला दोराचा फास लागल्याचे दिसून येत आहे.
आज सकाळी शेतात कामासाठी जाणाऱ्या मजुरांना पुलाजवळ दुर्गंधी आल्याने त्यांनी येथे दुर्गंधी कशी येत आहे या बाबत बघितले असता हा प्रकार उघडकीस आला, सदरचा प्रकार चिनावल गावात वाऱ्यासारखा पसरल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली, घटनास्थळी निंभोरा व सावदा येथील पोलिसांनी पुलापासून तब्बल एक ते दीड किमी अंतर वाहून गेलेल्या बैलाना चिनावल येथील गावकऱ्यांच्या मदतीने मृत बैलाना जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून पुरवण्यात आले. या कामी चिनावल येथील श्रीकांत सरोदे, हितेश भंगाळे, योगेश पाटील, निलेश गारसे, विशाल बोरोले, गजू साळुंके, किरण महाजन, वैभव नेमाडे व पशु संवर्धन विभागाचे डॉ लहासे, यांनी सहकार्य केले.
हे वाचलंत का ?
- Viral Video:नवरीला लागली हळद,रात्री नाचताना नवरीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,ज्या दिवशी तिचे लग्न त्याच दिवशी निघाली अंत्ययात्रा, दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा
- चुलत दीरासोबत अनैतिक संबंध, पती पत्नीमध्ये वाद, प्रियकराच्या मदतीने पत्नीने शेतकरी पतीचा केला खून; अन् अपघाताच्या केला बनाव.
- घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाने घेतले भिकाऱ्याचे सोंग; पंचायत समिती कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन.
- नवरदेव वऱ्हाडीसह लग्नासाठी मांडवात आला, अचानक मधमाशांनी केला हल्ला,नवरदेव नवरीला घेऊन पळाला,19 वऱ्हाडीं जखमी.
- दुसऱ्या तरुणाशी लग्न का केलं अस म्हणत नवविवाहित दाम्पत्याची कार अडवून नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच….