पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये वालचंद विद्यालय कळंब मधिल सहा विद्यार्थी उत्तीर्ण. वालचंदनगर पोलिस स्टेशनचे ए एस आय श्री पाटमास साहेब व वालचंद विद्यालयाचे अध्यक्ष श्री रामचंद्र कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.


कळंब :- ( ता. इंदापूर ) २०१८ – १९ व २०१९ – २० या शैक्षणिक वर्षामध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नामांकित असलेल्या वालचंद विद्यालय कळंब मधिल अनुक्रमे कु.ईशा सुरेश काशिद,कु.सानिका सुहास रूपनवर,कु.कोमल बाळासाहेब अर्जून,कु.राजनंदिनी दत्तात्रय घोडके,चि.प्रणव विठ्ठल अर्जून,कु.स्नेहा भारत घोडके सर्व इ.७ वी या सहा विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला.


दिनांक २७/०९/२०२२ मंगळवार रोजी वालचंद विद्यालय कळंबच्या प्रांगणात सकाळी ठिक ११ वाजता वालचंदनगर पोलिस स्टेशनचे ए एस आय श्री पाटमास साहेब व वालचंद विद्यालयाचे अध्यक्ष श्री रामचंद्र कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत वरील सहा यशस्वी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.व त्यांच्या पुढील वाटचालीस उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र कदम यांनी वालचंद विद्यालय कळंब हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे विद्यालय म्हणून इंदापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध असून विद्यालयातील आजपर्यंतचे विद्यार्थी अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आहेत तसेच आज शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त करून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला याचा माझ्यासह सर्व शिक्षक वर्ग व समस्त पालकांना याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगून यापुढील काळातही सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या सर्व कला गुणांना वाव देण्यासाठी विद्यालयाचा अध्यक्ष या नात्याने सदैव आपल्या सर्वांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विद्यालयातील श्री सुरेश काशिद सर, श्री आळंद सर, श्री धनवडे सर,श्री पावरा सर,श्रीमती करगळ,श्रीमती पाटील मॅडम,श्रीमती हजारे मॅडम यांचेही अध्यक्ष श्री रामचंद्र कदम यांनी कौतुक केले.


या सत्काराप्रसंगी कळंब ग्रामपंचायत सदस्य इक्बाल शेख,पालक श्री विठ्ठल अर्जून,वालचंद विद्यालय व ज्यूनिअर काॅलेज कळंबचे प्राचार्य श्री बी.के.सर्वगोड सर, पर्यवेक्षक श्री राजेंद्र माळवदकर सर, ज्यूनिअर विभाग प्रमुख श्री सचिन सावंत सर,शिक्षक प्रतिनिधी श्री गलांडे सर, श्री बोंद्रे सर, श्री सुरेश अर्जून सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार