जळगाव : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पुलाजवळ पायी चालणाऱ्या गुणवंत पाटील (वय २६, रा.डोंबिवली, जि.ठाणे) या तरुणाला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी १० वाजता झाला. मयताची पूर्ण ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणवंत पाटील हा तरुण रस्त्याने पायी जात होता. त्याच्याजवळ दवाखान्याच्या उपचाराचा कागदपत्रे असलेली पिशवी होती. या अपघाताची माहिती डायल ११२ वर मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे किरण अगोने व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. गुणवंत याच्या पोटावरुन चाक गेले आहे. कागदपत्रांवरुन तो डोंबिवलीचा रहिवाशी असून कल्याण येथे उपचार घेतले आहेत. सात बारा उतारा देखील या पिशवीत मिळून आलेला आहे. तो जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी किंवा नातेवाईक असावा असाही अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कागदपत्रांवरुन त्याची पूर्ण ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.
हे वाचलंत का ?
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले