सध्या देशात अपघात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच मध्यप्रदेशच्या रिवामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झाले आहेत. 3 वाहनांची धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. बस टेम्पो यांची धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे.
एमपी-यूपी सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 30 वरती हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सोहागी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या घटनेतील जखमींना टुंथर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्रीची असल्याचे सांगण्यात येत आहे. बस जबलपूरहून रेवामार्गे प्रयागराजला जात होती.
प्रवासी दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी सिकंदराबाद, हैदराबाद येथून लखनौमध्ये त्यांच्या घरी जात होते. दरम्यान, बसमध्ये पहिली प्रवासी बस लखनीसाठी कटनीला पोहोचली. यात अधिक प्रवासी होते. तेथून बस उत्तर प्रदेशातील लखनौला प्रवाशांसह रवाना झाली होती आणि बस रीवाच्या सोहागी डोंगरावर येताच ती नियंत्रणाबाहेर गेली आणि ट्रकला धडकली.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






