श्री वर्धमान विद्यालयात उत्साहात साजरा झाला संविधान दिन.

Spread the love


झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.


वालचंदनगर :- ( ता. इंदापूर )
भारताचे संविधान म्हणजेच राज्यघटना होय. विद्यालयात संविधान पुस्तिकेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त उबाळे सर यांनी संविधानाचे महत्त्व आपल्या मनोगतातून सांगितले.

उद्देशिकेचे वाचन शिक्षिका नलिनी गायकवाड यांनी केले. संविधान दिनानिमित्त वालचंदनगर मध्ये भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देऊन संविधानाचे महत्व नागरिकांना सांगितले. कार्यक्रमासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे एपीआय साळुंखे साहेब उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्याध्यापक बाळासाहेब पडारी सर यांनी केले तर सूत्रसंचालन सुरज मोरे सर यांनी केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार