दुर्दैवी घटना : यात्रेत बारागाडे ओढण्याच्या कार्यक्रमात चाक पोटावरुन गेलं, १० महिन्यांचा चिमुरडा पोरका.श, एरंडोल तालुक्यातील घटना.

Spread the love

एरंडोल : – सध्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात यात्रानां सारवात झाली आहे अश्यातच एरंडोल तालुक्यातील तळई गावात बारागाडे ओढण्याच्या कार्यक्रमात गर्दीत पळताना एक तरुण बारा गाड्यांच्या समोर येऊन खाली पडला व त्याच्या पोटावरून चाक गेल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या तरूणाचा जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना रात्री अडीच वाजता मृत्यू झाला आहे. राहूल पंडीत पाटील (वय ३०, रा. तळई ता. एरंडोल) असं मृत तरुणाचे नाव आहे.

चंपाषष्ठी निमित्त जळगाव जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच पद्धतीने मंगळवारी एरंडोल तालुक्यातील तळई येथे चंपाषष्ठी निमित्त बारागाडे ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तळई गावातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या गर्दीत राहूल पाटील हा देखील त्यांच्या मित्रासोबत उभा होता. यावेळी बारा गाड्यांजवळून गर्दीत पळताना पायात पाय अडकल्याने राहूल बारागाड्यांच्या समोर आला. या दुदैवी घटनेत त्याच्या पोटावरून चाक गेल्याने राहुल गंभीररित्या जखमी झाला.

राहूलला तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आज बुधवारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक ललित भदाणे करत आहेत.

दहा महिन्यांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले

दरम्यान, राहूल पाटील हा दीड वर्षापूर्वीच एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील जिल्हा बँकेच्या शाखेत लिपिक म्हणून नोकरीला लागला होता. तर नोकरी लागल्यानंतर दीड ते दोन वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याला दहा महिन्यांचा रुद्र नावाचा मुलगा देखील आहे. रुद्रचा पुढच्या महिन्यात पहिला वाढदिवस होता. मात्र, त्यापूर्वीच दुर्दैवी घटना घडली आणि रुद्रचे वडील हे जग सोडून गेले. राहुलच्या पश्चात वडील पंडित मिठाराम पाटील, आई सरला, पत्नी अश्विनी तर लहान भाऊ महेंद्र असा परिवार आहे. दहा महिन्यांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार