धुळे :- तालुक्यातील बोरकुंड गावामध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे काही चिमुरड्यांनी चंद्रज्योतच्या बिया काजू समजून खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काजू समजून चंद्रज्योतच्या बिया खाल्ल्यामुळे ७ चिमुरड्यांची प्रकृती बिघडली असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. धुळे तालुक्यातील बोरकुंड गावातील आदिवासी वस्तीत लहान बालकांनी खेळता खेळता काजू समजून चंद्रज्योतच्या बिया खाल्ल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांचे शासकिय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सध्या उपचार सुरु आहेत.
काजू समजून चंद्रज्योत फळाच्या बिया खाल्ल्यामुळे ७ मुलांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची घटना काल धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात घडली. आपल्या घराजवळ खेळत असताना मुलांनी चंद्रज्योतच्या झाडाखाली पडलेल्या बिया दिसल्या, खेळता खेळता काजू समजून मुलांनी या विषारी बिया खाल्ल्या. मात्र, काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. मुलांची प्रकृती खालावल्याने पालकांनी त्यांना तातडीने शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं.
यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर ६ मुलं बेशुद्ध झाली असून त्यांच्यावर सध्या बाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, त्यांना देखील त्रास होत असल्याने त्यांना २४ तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video:परमेश्वरा अशी सून नको रे बाबा! आजारग्रत सासू अन् सासऱ्याला डॉक्टर सूनेची अमानुषपणे मारहाण पाहुन व्हिडिओ तुम्हीपण अवाक् व्हाल.
- पत्नीने प्रियकराला बोलावले घरी, अचानक पती आला घरी त्याने पत्नीस प्रियकरा सोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीच्या संयम सुटला अन्……
- सैनिक एन्क्लेव्ह मधील एका रूममध्ये आठ मुली, बाहेर मुलांची तोबा गर्दी, पोलिसांना आला संशय अचानक टाकला छापा,अन् त्यांना धक्का बसला….
- जळगाव तालुक्यात भरदिवसा माजी उपसरपंचावर चाकू आणि चॉपरने वार करून केली निघृण हत्या.घरच्यांचा आक्रोश.
- नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही संपविले जीवन; ज्या नातूसअंगाखांद्यावर खेळवल तो डोळ्यासमोर गेल्याने आजोबांनी पेटत्या चितेत उडी मारून दिला जीव.