धुळे :- तालुक्यातील बोरकुंड गावामध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे काही चिमुरड्यांनी चंद्रज्योतच्या बिया काजू समजून खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काजू समजून चंद्रज्योतच्या बिया खाल्ल्यामुळे ७ चिमुरड्यांची प्रकृती बिघडली असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. धुळे तालुक्यातील बोरकुंड गावातील आदिवासी वस्तीत लहान बालकांनी खेळता खेळता काजू समजून चंद्रज्योतच्या बिया खाल्ल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांचे शासकिय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सध्या उपचार सुरु आहेत.
काजू समजून चंद्रज्योत फळाच्या बिया खाल्ल्यामुळे ७ मुलांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची घटना काल धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात घडली. आपल्या घराजवळ खेळत असताना मुलांनी चंद्रज्योतच्या झाडाखाली पडलेल्या बिया दिसल्या, खेळता खेळता काजू समजून मुलांनी या विषारी बिया खाल्ल्या. मात्र, काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. मुलांची प्रकृती खालावल्याने पालकांनी त्यांना तातडीने शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं.
यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर ६ मुलं बेशुद्ध झाली असून त्यांच्यावर सध्या बाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, त्यांना देखील त्रास होत असल्याने त्यांना २४ तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






