धुळे :- तालुक्यातील बोरकुंड गावामध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे काही चिमुरड्यांनी चंद्रज्योतच्या बिया काजू समजून खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काजू समजून चंद्रज्योतच्या बिया खाल्ल्यामुळे ७ चिमुरड्यांची प्रकृती बिघडली असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. धुळे तालुक्यातील बोरकुंड गावातील आदिवासी वस्तीत लहान बालकांनी खेळता खेळता काजू समजून चंद्रज्योतच्या बिया खाल्ल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांचे शासकिय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सध्या उपचार सुरु आहेत.
काजू समजून चंद्रज्योत फळाच्या बिया खाल्ल्यामुळे ७ मुलांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची घटना काल धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात घडली. आपल्या घराजवळ खेळत असताना मुलांनी चंद्रज्योतच्या झाडाखाली पडलेल्या बिया दिसल्या, खेळता खेळता काजू समजून मुलांनी या विषारी बिया खाल्ल्या. मात्र, काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. मुलांची प्रकृती खालावल्याने पालकांनी त्यांना तातडीने शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं.
यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर ६ मुलं बेशुद्ध झाली असून त्यांच्यावर सध्या बाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, त्यांना देखील त्रास होत असल्याने त्यांना २४ तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






