कोपरगाव :- तालुक्यातील पढेगाव येथील वारकरी सांप्रदयाच्या शेतकरी कुटुंबातील भागीरथीबाई भगीरथ शिंदे (वय 70) व त्यांचे पती ह.भ.प. भगीरथ दगडू शिंदे (वय 73) यांचे मंगळवारी (दि.4) निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी , दोन मुले,जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. दोघांचाही एकाच दिवशी तीन तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याने त्याची चर्चा सोशल मिडीयावरून सर्वत्र होत असून हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी पत्नी भगीरथीबाई यांचे सकाळी 10.15 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता. अंत्यविधिची तयारी चालु असताना त्याच दिवशी तीन तासांच्या अंतराने दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भगीरथ यांचेही हृदयविकाराने निधन झाले.एकाच दिवशी आई-वडीलांचे निधन झाल्यामुळे शिंदे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

दुपारी तीन वाजेच्या सुमारास पढेगाव वैकुंठभूमीत या दांपत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.जेमतेम परिस्थिती असलेले हे शेतकरी कुटुंब समाधानी व धार्मिक होते.त्यांच्या पाठोपाठ जाण्यामुळे स्वर्गातून भगीरथापाठोपाठ गंगा पृथ्वीवर आली आणि भागीरथी झाली, आज भागीरथी पाठोपाठ भगीरथ वैकुंठाला गेला अशी हळहळ व्यक्त होत होती.
हे देखील वाचा
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..