(योगेश मोरे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी)
खरीप हंगामामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 हजार 300 कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याचं भुमरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ‘देवगिरी मैदान’ पोलीस आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला. त्यावेळी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. दरम्यान, यावेळी बोलताना भुमरे म्हणाले की, शेतकरी आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे.
शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत आहे. सिंचनाचे प्रमाण वाढावं म्हणून राज्य सरकार पुरेशा उपाय योजना करत आहे. पहिल्या टप्यात यशस्वी ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्यासाठी जिल्ह्यातील 119 गावांची निवड करण्यात आली आहे. आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
हे देखील वाचा
- Viral Video:नवरीला लागली हळद,रात्री नाचताना नवरीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,ज्या दिवशी तिचे लग्न त्याच दिवशी निघाली अंत्ययात्रा, दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा
- चुलत दीरासोबत अनैतिक संबंध, पती पत्नीमध्ये वाद, प्रियकराच्या मदतीने पत्नीने शेतकरी पतीचा केला खून; अन् अपघाताच्या केला बनाव.
- घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाने घेतले भिकाऱ्याचे सोंग; पंचायत समिती कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन.
- नवरदेव वऱ्हाडीसह लग्नासाठी मांडवात आला, अचानक मधमाशांनी केला हल्ला,नवरदेव नवरीला घेऊन पळाला,19 वऱ्हाडीं जखमी.
- दुसऱ्या तरुणाशी लग्न का केलं अस म्हणत नवविवाहित दाम्पत्याची कार अडवून नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच….