(योगेश मोरे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी)
खरीप हंगामामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 हजार 300 कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याचं भुमरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ‘देवगिरी मैदान’ पोलीस आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला. त्यावेळी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. दरम्यान, यावेळी बोलताना भुमरे म्हणाले की, शेतकरी आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे.
शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत आहे. सिंचनाचे प्रमाण वाढावं म्हणून राज्य सरकार पुरेशा उपाय योजना करत आहे. पहिल्या टप्यात यशस्वी ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्यासाठी जिल्ह्यातील 119 गावांची निवड करण्यात आली आहे. आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






