जामनेर : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. एकीकडे अवकाळीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
आता जनावरांवरही हे संकट घोंगावत आहे. गारपीट आणि वादळी पावसाच्या तडाख्यात सापडून साडेपाचशे मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना जामनेर तालुक्यातील पिंपळगाव, नांदगाव भागात घडलीय असून या घटनेमुळे मेंढ्या पालन करणाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
जामनेर तालुक्यात मागील काही दिवसापासून गारपिटीसह वादळी पावसाने तडाखा दिला आहे. याच दरम्यान, काल रविवारी पिंपळगाव आणि नांदगाव परिसरात शेत शिवारात वास्तव्यास असलेल्या भगवान कोळेकर आणि सीताराम कोळेकर या मेंढपाळाच्या मेंढ्या वादळात सापडल्या. वादळी वाऱ्यांचा तडाखा जोरदार असल्याने आणि कोणताही आडोसा बाचावासाठी जवळ नसल्याने या मेंढ्या वादळी वाऱ्यात सापडल्या.
हे देखील वाचा
- Viral Video: मार्केटमध्ये एक सुंदर ड्रेस दोन महिलांना आवडला तो घेण्यावरून सुरू झाला वाद मग सुरू झाली तुंबळ हाणामारी पहा व्हिडिओ
- महाविद्यालयाच्या हॉस्टेलच्या बाथरूममध्ये इतर मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ शूट करून तरुणीने क्लिप्स पाठवल्या प्रियकरास, तरुणीस पोलिसांनी घेतले ताब्यात.
- हृदयद्रावक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हळद सुकण्यापूर्वीच नववधूच्या मांडीवर डोके टेकत नवरदेवाने सोडला प्राण, सर्वत्र हळहळ.
- संघटित गुन्हे करणाऱ्या घरफोडीतील गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद,१लाख ८५ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त.
- Viral Video:एक्स्प्रेसवेवर तरुणांची सुसाट वेगाने बाईक चालवत जीवघेणी स्टंटबाजी; तोल जाताच कोसळले, मागून आला ट्रक अन् पहा काळजात धडकी भरेल असा व्हिडिओ.