सहा वर्षांच्या मुलास आधी मिठी मारली,मग दोन्ही बापलेकांनी विहिरीत उडी मारून केली आत्महत्या.

Spread the love


मालेगाव: तालुक्यातील आघार-ढवळेश्‍वर रस्त्यालगत राहणाऱ्या यशवंत लक्ष्मण हिरे (वय ४२) व त्यांचा लहान मुलगा रुद्र यशवंत हिरे (वय ६) या पिता-पुत्रांनी अजंग शिवारातील शेती महामंडळाच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आघार येथील यशवंत हिरे यांचा पशुखाद्यचा व्यवसाय आहे. विशेषत: म्हशींना लागणारे बिअर खाद्य ते घाऊक भावाने घेऊन ग्रामीण भागात त्यांच्या पिकअपमधून किरकोळ विक्रेत्यांना विकतात. आज सकाळी त्यांनी मुलगा रुद्र यालाही बरोबर घेतले. शहरालगतच्या मनमाड चौफुलीवरुन बिअर खाद्य घेत ते पिकअपमध्ये भरले.
पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तातडीने मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे शकील तैराक यांनी प्रथम यशवंत यांचा व नंतर रुद्रचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

यशवंत यांनी मुलगा रुद्रला मिठी मारली होती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे आघार व परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करीत आहेत.
वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा होत असून परिसरात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.

हे देखील वाचा

टीम झुंजार