पारोळा – शहरातील भुईकोट किल्ला हा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या काळापासुनची ऐतिहासिक वास्तु म्हणुन माणली जाते. या किल्ल्यात अतिप्राचिन खंदक देखील आहे. गत काळात या किल्ल्याचा जतन व संवर्धनासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी प्रयत्न केले होते. तेव्हा बरिचशी विकासकामे देखील करण्यात आली. परंतु निधी अभावी या भुईकोट किल्ल्याची उर्वरित कामे करता आली नाही. त्यात अति महत्त्वाचे म्हणजे किल्ल्यातील खंदक. प्राचीन काळापासुन हे खंदक आजही आहे त्या अवस्थेतच आहे.
हा किल्ला ऐतिहासिक वास्तु असल्याने देशभरातुन पर्यटक व संशोधक येथे येत असतात. या किल्ल्याचे जतन व संवर्धन होऊन ही ऐतिहासिक वास्तु पर्यटन स्थळ म्हणुन विकसित व्हावे यासाठी आमदार चिमणराव पाटील हे अनेक वर्षांपासुन प्रयत्नशिल होते. या किल्ल्यात विशेष म्हणजे खंदकाचे पुनरूज्जीवन करणे हे अत्यंत महत्त्वाचे होते. सद्यपरिस्थिती हे खंदक अतिशय दुरावस्थेत आहे.
गेल्या अनेक दशकांपासुन खंदकातील पाणी अशुद्ध असल्याने खंदकाचा भोवती घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याला देखील याचा मोठा धोका होता. ही परिस्थिती बदलावी, हे ऐतिहासिक खंदक शहरवासियांसह पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना एक आकर्षण व्हावे व या खंदकात साठवलेल्या पाण्यावर योग्य ती प्रक्रीया करून हे पाणी शहरवासियांचा उपयोगात यावे हि आमदार चिमणराव पाटील यांची दुरदृष्टी होती.
त्यासाठी आमदार चिमणराव पाटील हे सतत पाठपुरावा करित होते. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले असुन महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडुन अमृत २.० अभियानांतर्गत या भुईकोट किल्ल्यातील खंदकाचा पुनरूज्जीवन व सुशोभिकरणासाठी ४.९७ कोटी रूपयांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष तथा लाडके मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार मानले आहेत.
हे देखील वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.