प्रतिनिधी | एरंडोल
एरंडोल : खरीप हंगामासाठी फक्त काही दिवस शिल्लक असून शेतकरी शेतीच्या मशागत करण्यात व्यस्त आहे. कोणते बियाणे घ्यावे अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये जोर करत असून विविध कंपन्यांच्या प्रचार गाड्या देखील गावोगावी फिरत आहेत. मागील वर्षी अंकुर सिड्सच्या “स्वदेशी ५” या प्रचलित वाणाच्या नावाखाली बोगस बियाण्याची विक्री होवून शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
गुजरात राज्यातील आनंद व वडोदरा या ठिकाणी कापसाचे वाणाचे बिजोत्पादन घेतले जाते, मात्र तेथील शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे पाठ फिरवली असून तंबाखू उत्पादनावर भर दिला आहे.
त्यामुळे या वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असलेली ‘स्वदेशी ५’ बियाणे मिळणार नाही. त्यामुळे स्वदेशीच्या नकली वाणांपासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन बी. एस. मोरे कृषि अधिकारी पंचायत समिती एरंडोल यांनी केले आहे.
हे पण वाचा
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.