प्रतिनिधी | एरंडोल
एरंडोल : खरीप हंगामासाठी फक्त काही दिवस शिल्लक असून शेतकरी शेतीच्या मशागत करण्यात व्यस्त आहे. कोणते बियाणे घ्यावे अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये जोर करत असून विविध कंपन्यांच्या प्रचार गाड्या देखील गावोगावी फिरत आहेत. मागील वर्षी अंकुर सिड्सच्या “स्वदेशी ५” या प्रचलित वाणाच्या नावाखाली बोगस बियाण्याची विक्री होवून शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
गुजरात राज्यातील आनंद व वडोदरा या ठिकाणी कापसाचे वाणाचे बिजोत्पादन घेतले जाते, मात्र तेथील शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे पाठ फिरवली असून तंबाखू उत्पादनावर भर दिला आहे.
त्यामुळे या वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असलेली ‘स्वदेशी ५’ बियाणे मिळणार नाही. त्यामुळे स्वदेशीच्या नकली वाणांपासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन बी. एस. मोरे कृषि अधिकारी पंचायत समिती एरंडोल यांनी केले आहे.
हे पण वाचा
- Viral Video:परमेश्वरा अशी सून नको रे बाबा! आजारग्रत सासू अन् सासऱ्याला डॉक्टर सूनेची अमानुषपणे मारहाण पाहुन व्हिडिओ तुम्हीपण अवाक् व्हाल.
- पत्नीने प्रियकराला बोलावले घरी, अचानक पती आला घरी त्याने पत्नीस प्रियकरा सोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीच्या संयम सुटला अन्……
- सैनिक एन्क्लेव्ह मधील एका रूममध्ये आठ मुली, बाहेर मुलांची तोबा गर्दी, पोलिसांना आला संशय अचानक टाकला छापा,अन् त्यांना धक्का बसला….
- जळगाव तालुक्यात भरदिवसा माजी उपसरपंचावर चाकू आणि चॉपरने वार करून केली निघृण हत्या.घरच्यांचा आक्रोश.
- नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही संपविले जीवन; ज्या नातूसअंगाखांद्यावर खेळवल तो डोळ्यासमोर गेल्याने आजोबांनी पेटत्या चितेत उडी मारून दिला जीव.