मुंबई दि 20 (प्रतिनिधी) काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. याची माहिती व तैलचित्र या मंदिर परिसरात उभारावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथरावं शिंदे यांना पॅन्थर डॉ. राजन माकणीकर केलेल्या मागणी पत्रात असे म्हटले आहे की,
काळाराम मंदिर सत्याग्रहामधील बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड व इतर सत्याग्रही, १९३० आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला होता.
मात्र; या इतिहासिक घटनेचा मंदिर परिसरात उल्लेख केला नसल्याचे दिसून येत आहे. काळाराम मंदिर एक इतिहासिक घटनेचे साक्षीदार असून सदर मंदिर परिसरात या इतिहासिक घटनेचे विवरण माहिती व तैलचित्र उभारावे अशी मागणी आर पी आय संविधान पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.