अल्पवयीन मुलीचे लग्न केले म्हणून ब्राह्मण, फोटोग्राफर, आचारी यांचेसह काही प्रतिष्ठित लोक,नातेवाईक अश्या 32 जणांवर गुन्हा दाखल.

Spread the love


बीड :- आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी 32 जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये नवरी, नवरदेवाच्या आई-वडिलांसह फोटोग्राफर, आचारी, लग्न लावणारा ब्राह्मण आणि काही प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे. या प्रकरणानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ग्रामसेवक शंकर मुरलीधर म्हेत्रे यांनी आष्टी ठाणे गाठून फिर्याद दिली. ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीवरून 32 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची नावं भास्कर आश्रुबा पालवे, सिंधुबाई भास्कर पालवे, आश्रुबा पालवे, केसरबाई पालवे, शिवाजी पालवे, संगीता पालवे, चंद्रकांत पालवे, साखरबाई पालवे, भीमराव पालवे, चतुराबाई पालवे, विठ्ठल पालवे, परमेश्वर पालवे, युवराज पालवे, सुभाष पालवे, एकनाथ पालवे, शंकर पालवे, लहू पालवे, अशोक वनवे, रामराव वनवे, विजय गोल्हार (रा. मुर्शदपूर आष्टी), राहुल काकडे, संदीप अर्जुन गर्जे, अर्जुन बाबू गर्जे यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाजंत्रीवाल्यांवरही गुन्हा दाखल या प्रकरणात नवरदेवाचा मामा, नवरीचा मामा फोटोग्राफर, वाजंत्रीवाले, मंडपवाले, लग्न लावणारे ब्रह्मण, आचारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार