एक नवरी 20 नवरदेव! दीड महिन्यात नाव बदलून दोन तरुणांबरोबर केला विवाह,पैसे दागिने घेवून व्हायची पसार,या घोटाळेबाईसह 6 जणांना अटक.

Spread the love

नारायणगाव :- जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी व खोडद येथील शेतकरी कुटुंबातील दोन तरुणांबरोबर दीड महिन्यात एकाच मुलीचा नाव बदलून विवाह लावून दागिणे रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या टोळीतील बनावट नवरी मुलीसह 6 जणांच्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक करून जेरबंद केले आहे.
परिसरात या टोळीने 20 पेक्षा जास्त मुलांना अशाच पद्धतीने गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी बनावट नवरी जयश्री काळू घोटाळे बनावट मावशी मीरा बन्सी विसलकर (वय-39), तुकाराम भाऊराव मांगते (वय-23, दोघेही राहणार अंबुजा वाडी, इगतपुरी घोटी, जिल्हा नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय- 46 राहणार बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर), एजंट शिवाजी शंकर कुरकुटे( वय 64, राहणार- कुरकुटेवाडी, बोटा, तालुका संगमनेर जिल्हा नगर), बाळू गुलाब सरवदे (वय 41,राहणार गुंजाळवाडी, तालुका जुन्नर जिल्हा पुणे) या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपींनी संगणमत करून जयश्री काळू घोटाळे हिचा सागर प्रभाकर वायकर( वय 23 राहणार गुंजाळवाडी, तालुका जुन्नर) यांच्याशी 10 मे 2023 रोजी जुन्नर येथे तर हरीश बाळशिराम गायकवाड (वय 35 राहणार खोडद तालुका जुन्नर जिल्हा पुणे ) यांच्याशी 28 मे 2023 रोजी आळंदी ते विवाह लावून दिला होता. सागर वायकर यांच्याशी विवाह लावताना नवरी मुलगी जयश्री काळू घोटाळे हिचे नाव संध्या विलास बदादे (वय 23 ) असे तर हरीश गायकवाड यांचेशी लग्न लावताना अश्विनी रामदास गवरी (वय 25) असे सांगण्यात आले होते.

विवाह जमवण्यासाठी या टोळीने वायकर यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये रोख तर हरीश गायकवाड यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपये रोख घेतले होते. लग्न लावल्यानंतर बनावट नवरी मुलगी धार्मिक विधीसाठी चार ते पाच दिवस सासरी राहत असे. त्यानंतर बनावट मावशी मीरा बन्सी विसलकर ही नवरी मुलंगी माहेरी घेऊन जात असे. त्यानंतर नवरी मुलगी दागिन्यास फरार होत असे. याबाबतीत तक्रार सागर वायकर व हरिष गायकवाड यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दोन जून 2024 रोजी दिली होती. याप्रकारे आळेफाटा येथे सुद्धा एका तरुणाची फसवणूक झाली होती.

हे पण वाचा

टीम झुंजार