अक्षय भालेराव खून प्रकरणी एरंडोल येथे तहसीलदारांना निवेदन, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

Spread the love

एरंडोल :- बोंढार जिल्हा नांदेड येथील अक्षय भालेराव या बौद्ध युवकाचा काही दिवसापूर्वी खून करण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावात पहिल्यांदाच साजरी केल्याचा राग म्हणून त्याचा खून करण्यात आला आहे, असे एकूण प्रकारावरून दिसते. अत्यंत क्रूर आणि निर्घुणपणे हा खून करण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच गावातील बौद्ध वस्तीवर विशिष्ट जात समूहामार्फत हल्ला सुद्धा करण्यात आलेला आहे. एकविसाव्या शतकामध्ये अशा पद्धतीची संविधान निर्मात्या संदर्भात आकसाची भावना निर्माण होणे अत्यंत निंदनीय बाब आहे. जातीयतेची ही भावना प्रबळ होणे देशाची अखंडता, एकात्मता व प्रगतीच्या अनुषंगाने बाधा आणणारी बाब आहे.

अशा पाशवी वृत्तीचा व सामाजिक मानसिकतेचा बिमोड करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. अक्षय भालेरावच्या एकूण प्रकरणांमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल जरी झालेला असला तरी आरोपी जामीनावर सुटू नये म्हणून त्यामध्ये अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अधिनियम 1989 संशोधित अधिनियम 2015 अंतर्गत 3(2)5 नुसार कलम समाविष्ट करणे गरजेचे आहे. गुन्ह्यातील तपास व्हिडिओ रेकॉर्डिंग करून करणे, आरोपींची व लग्नाच्या वरातीतील लोकांची ब्रेन मॅपिंग टेस्ट, नार्को टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट करणे, अक्षय भालेराव खून खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालविणे व अक्षय भालेरावच्या हत्येचा निपक्षपाती तपास करून मारेकऱ्यांना कठोर शासन होणे

इ. बाबत निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना पाठविले. सदर मागण्या पूर्ण न झाल्यास आंबेडकरी समाजामार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. एरंडोल तालुक्याच्या तहसीलदार मा. सुचिता चव्हाण यांना एरंडोल येथील विविध संघटनांच्या माध्यमातून सदर निवेदन देण्यात आले. एरंडोलचे माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम दादा गायकवाड यांच्या नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले. एनडीएमजेचे विभागीय प्रमुख भरत शिरसाठ यांनी निवेदनामागील भूमिका विशद केली.
शालिग्राम दादा गायकवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार व डॉक्टर संदीप कोतकर यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले.

महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेने संयम ठेवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन वक्त्यांच्या मनोगतातून करण्यात आले.
प्राध्यापक नरेंद्र गायकवाड, डॉक्टर नरेंद्र तायडे, प्राध्यापक विजय गाढे, चिंतामण जाधव सर, प्राध्यापक उमेश सूर्यवंशी, पत्रकार संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते जमील शेख, बाबुराव भगत, डॉक्टर अतुल सोनवणे, पत्रकार संघरत्न गायकवाड, नितीन बोरसे, प्रकाश शिंदे, मुकेश ब्राह्मणे, गौतम सोनवणे, शुभम तामस्वरे, उत्तम सरदार, देवानंद बेहरे, राजू सोनवणे, लक्ष्मण जाधव, सुलोचना खोब्रागडे, प्रशांत खोब्रागडे, आशाबाई जाधव, मनीषा जाधव, वर्षा शिरसाठ, रमाबाई ब्राह्मणे, मिनाबाई ब्रम्हे, सुवर्णा शिरसाट, शंकर शिरसाट,

https://www.youtube.com/@zunjaarnews

☝️☝️ वर दिलेल्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ????????????
Like share and Subscribe our youtube Channel

सर्जेराव खैरनार, रोहिदास मोरे, सुनील चव्हाण, जगदीश पवार, अशोक ब्रम्हे, संजय सपकाळे, सुनील खोकरे, प्रवीण बाविस्कर, गजानन पाटील, सिताराम मराठे, देविदास जाधव, बबन सोनवणे, सागर बोरसे, राहुल बोडरे, पंकज बेहेरे, मोहन सैंदाणे, रोहित रखमे, पितांबर सोनवणे इत्यादी मोठ्या प्रमाणात बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते. अक्षय भालेराव न्याय आंदोलन समिती एरंडोल, बौद्ध समाज मंडळ एरंडोल, बौद्ध साहित्य परिषद एरंडोल, एनडीएमजे जळगाव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट एरंडोल, वंचित बहुजन आघाडी एरंडोल, बामसेफ एरंडोल इत्यादी विविध संघटनांचा सदर निवेदनामध्ये सहभाग होता.

टीम झुंजार